Tuesday, November 2, 2021

New voter registration campaign maharashtra १६ नोव्हेंबरला होणार विशेष ग्रामसभा !

मतदार नोंदणीसाठी महिलांनी पुढे यावे, विशेष ग्रामसभेचे नियोजन.

संपूर्ण राज्यात १ नोव्हेंबर पासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करावे व शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांना केले.

दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
यासाठी दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभाग शासन निर्णय 


जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसेकर यांनी यावेळी दिली.

Tuesday, September 28, 2021

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता


 
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन

पालघर दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 

Dahanu 9607744258
Vikamgad 8806898565
Jawhar 8552918405
Mokshada 8446335908
Wada 02526271431
Talasari 02521220036
Vasai 02502322007
Palghar 02525254930

Monday, September 27, 2021

प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!

काळोख रात्र असावी, गगनात ढगाळ असताना काजवे इकडे तिकडे उडत असावे. काळोख कमी होताना व ढगाळ कमी होत असताना सूर्याची किरणे ढगांच्या बाजूला निघत होती. प्रकाशाची किरणे हिरवेगार रानांवर व झाडांवर पडत होता.  पाखऱयांचा चिवचिव असताना, प्रफुल्लित फुलपाखरं इकडे-तिकडे असताना आणि बागेत टवटवीत फुल्यांचा फुलले असताना माझ्या परिवारात वेगळेच आनंद झाला असावा. दि. २७ सप्टेंबर या दिवशी माझा जन्म झाला.  माझ्या आई-वडिलांना फार आनंद झाला असावा. माझ्या परिवारातील आजी-आजोबा  व इतर मंडळी फारच आनंद झालं असावे. पाहा ना आज! नैसर्गिक दुर्देवी आहे.  त्याचा जो आनंद होता, तो आज आनंद नाही आणि ते ही नाही दुर्भाग्यच? आईवडिलांची देणकी आहे की मी आहे आज. कैशालवाशी पूज्य आई-वडील यांच्या आर्शिवादाने आज माझा " जन्मदिवस" आहे. सर्व काही आज माझ्याकडे आहे आईवडिलांची देणं! जे काही घडलो आहे ते समाजामुळं. जे लिहलं गेलं वाढदिवसाच्या निमित्त ते काही एवढं मोठं नाही. प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!

Friday, September 17, 2021

इ श्रम कार्ड महानोंदणी असंघटित कामगारांची

सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. 
त्यासाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणीचा *"महामहोत्सव"* सुरु झाला आहे. 
असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?
१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार 
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार 
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे 
९. न्हावी
१०. घरगुती कामगार 
११. भाजीपाला विक्रेते
१२. फळ विक्रेते 
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे 
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार 
१७. आशा कामगार
१८. दूध उत्पादक शेतकरी
19. सामान्य सेवा केंदरचालक
20. स्थलांतरित कामगार
यासारखे असे अनेक लोक आहेत  त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E  SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. 
*इ श्रम नोंदणी साठी निकष* 
१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी 
२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी 
३. ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी 
४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी 
*इ श्रम नोंदणी साठी  लागणारी कागदपत्रे* 
१. आधार कार्ड 
२. मोबाइल नंबर 
३. बँक पासबुक 

* *असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....**