Friday, October 14, 2022

ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२

ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ सुरू. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रु. २४० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व रु. 56 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना Tractor yojana 2022  पार्श्वभूमी 

राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तथापि,शेती कामांसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे .सध्याचे व त्यामुळे शेती साठी येणारा खर्च, मजुरांचा अभाव यामुळे शेतीची कामे वेळेवर न होणे आणि प्रत्यक्ष शेतीतून मिळणारे उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय हा खडतर होत आहे.

सन २०२२ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून शेतीकरिता लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करावयाची झाल्यास पारंपारिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणात द्वारे शेती करणे आवश्यक आहे.

त्यासाठी पेरणी ,कापणी पश्चात प्रक्रिया यांत्रिकीकरणाने द्वारे करणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणे शक्‍य आहे.


महाराष्ट्रात सुमारे ८०% शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत .यांत्रिकी करण्यासाठी लागणारे यंत्र किंवा अवजारे शेतकरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे ,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ,राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान व एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत सुद्धा अल्पप्रमाणात यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

तथापि, शेतकऱ्यांकडून असणाऱ्या मागणीच्या प्रमाणात या योजनेमधून शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा करणे शक्य होत नाही .यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून  कृषी यांत्रिकीकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. तथापि, सद्यस्थितीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना मधून फारसा निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. तसेच ,राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ट्रॅक्टर, ऊस कापणी यंत्र, पावर टिलर यांसारख्या जास्त किमतीच्या यंत्रांना अनुदान अनुज्ञेय नाही. परंतु ,सदर यंत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मर्यादा आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १८ मे २०१८ राज्यात 100% राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ( Tractor yojana 2022 ) ही योजना राबविण्यास मान्यता दिली.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना योजना हि १०० % राज्य पुरस्कृत योजना आहे.

या योजने मध्ये

ट्रॅक्टर, पॉवर टीलर,

स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड),

ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, 

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,

अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना या योजनेत ५०% अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांना ४० % अनुदान मिळते. 

Tractor yojana 2022 अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.

त्याच प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी 60 टक्के, १२ लाख रु. पर्यंत अनुदान मिळते.

अल्प भूधारक / अत्यल्प भूधारक / महिला शेतकरी / अज / अजा शेतकरी

  • Tractor yojana 2022 ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
  • पॉवर टिलर – 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-
  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
  • रीपर – 75000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 25000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
  • कल्टीव्हेटर – 50000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-
  • नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
  • Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  20000/- रु.
  • Manually operated chaff cutter (above 3 feet)-  रु.6300/-.
  • Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  50 टक्के, रु.5000/-.

Tractor yojana 2022 या योजनेत इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ४० %  अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-

पॉवर टिलर –  8 बीएच पी पेक्षा कमी – 50000/- 8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त – 70000/-

स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/-
  • रीपर – 60000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 20000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) – 30000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 50000/-

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट – 34000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट – 35800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 16000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
  • कल्टीव्हेटर – 40000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 56000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 71600/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 32000/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 40000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
  • Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  16000/- रु.
  • Manually operated chaff cutter (above 3 feet)-  रु.5000/-.
  • Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  रु.4000/-

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  2.  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  3.  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  4. ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजाराचा टेस्ट रिपोर्ट ( machinery test report) परिक्षण अहवाल 
  5. बँक पास बुक,
  6. यंत्राचे कोटेशन,
  7.  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  8.  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असणार आहे. 
  9.  शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा  / औजाराचा  लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सन २०२१ – २२ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०२२ – २३  मध्ये इतर औजारासाठी मात्र तो शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र राहील. 

How to apply tractor yojana 2022 अर्ज कुठे करावा

Tractor yojana 2022 या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

यासाठी शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात.

एक शेतकरी एक अर्ज योजना ( Mahadbt Farmer Scheme ) अनेक या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” ( Farmer Scheme ) हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.

फळपीक विमा योजना सन 2022

राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर आजपासून


मोदी सरकारच्या पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर रबी पिकांच्या विम्याच्या शेवटची तारीख 31 नोव्हेंबर 2022 आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाख्यात लेखी कळवावे. कर्ज न घेतलेले शेतकरी सीएससी सेंटर, बँक, एजेंट मार्फत किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वतः करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळते. हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांची मेहनतीची कमाई ही काही क्षणातच वाया जाते. शेतकऱ्याची ही समस्या विचारात घेऊन भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.

पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?

पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.


पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?

पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल 
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.

किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो.  पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.


लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?

शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.


फळ पिक विमा योजना २०२२ अर्ज सुरू | Falpik vima RWBCIS

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधीक असल्याने शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो.

ही बाब विचारात घेऊन शेतकऱयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती अबाधीत राखण्याच्या दृष्ट्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने फळ पीक विमा ( fal pik vima yojana rwbcis )  योजना राबविण्यात येते. 


विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकते वर परिणाम होऊन मोठ्या प्रमानावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱयांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक  नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना ( Falpik vima RWBCIS )राबविली जाते.

पुनर्गचित  हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहारामध्ये ( ambiyabahar fal pik vima ) संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या फळासाठी महसूल मंडळ घटक धरून ही योजना राबविली जाते.

सन 2022 – 23 या वर्षात याकरिता पीक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. 

फळ पिक GR येथे पहा

Click here to Download

अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे

द्राक्ष- 30 October

डाळिंब  14 January

मोसंबी 31 October

संत्रा 30 November

केळी 31 October

पपई 31 October

काजू 30 नोव्हेंबर

आंबा कोकण 30 नोव्हेंबर, आंबा इतर 31 December

पिक विम्यासाठी उत्पादन क्षम वय

मोसंबी 3 year, संत्रा 3 Year, सीताफळ 3 Year, चिकू 5 Year लिंबू 4 Year, पेरू 3 Year, डाळिंब 2 Year, द्राक्ष 2 Year, आंबा 5 वर्ष , काजू 5 वर्ष

falpik vima

फळ पीक विमा राबविण्याऱ्या जिल्हानिहाय विमा कंपन्या

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : 

अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार

एचडीएफसी एर्गो  जनरल इन्शुरन्स : 

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर

भारतीय कृषी विमा कंपनी : 

रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद



Thursday, October 13, 2022

आर,गुंठा,एकर याबद्दल महत्वाची माहिती !


एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट​


एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो



'१ गुंठा' जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

''एक गुंठा'' 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Additional info

   १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

   १ चौ.मैल = ६४० एकर

   १ चौ.किमी = २४७ एकर



एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट


गुंठा हे ब्रिटीश मापन एकक आहे. ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे त्यांची मापन पद्धती रूढ होती. स्वतंत्र भारतामधे 1955 पासून हळूहळू 1962 पर्यंत ही मापन पद्धती बदलून फ्रेंच म्हणजे मेट्रिक पद्धती आणली गेली. खरंतर त्या कायद्यानूसार भारतात फक्त ब्रिटीश एकतात मापे लिहीणे हा गुन्हा आहे. मेट्रिक मधे लिहीणे हे बंधनकारक आहे. परंतु कितीतरी वर्ष ब्रिटीश मापन पद्धती वापरली गेल्यामुळे अजूनही ती वापरली जाते, मात्र सोबत मेट्रिक पद्धतीचे माप लिहीणे बंधनकारक आहे.  'एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट'

 नमस्कार मित्रांनो मी संदेश भुरकुड आपण आज बघणार आहेत की एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट 

मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघू 1 गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट 

1 गुंठा = 33फुट 33फुट  = 1089 चवरस फुट 

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

१ चौ.मैल = ६४० एकर

१ चौ.किमी = २४७ एकर 


असो, 3 फुट म्हणजे 1 यार्ड. 1 चौ यार्ड म्हणजे 9 चौ फुट. 121 चौ यार्ड म्हणजे 1 गुंठा. म्हणजेच 33 फुट X 33 फुट = 1089 चौ फुट म्हणजे 1 गुंठा. '

'एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट''

1 गुंठा म्हणजे किती चौरस मीटर?
एक गुंठा म्हणजे 33 फूट बाय 33 फुट जागा म्हणजेच 1089 चौरस फूट. त्याला 10.76 ने भगिले असता उत्तर येते 101.20 चौरस मीटर. म्हणजेच एक गुंठा म्हणजे 101.20 चौरस मीटर.

एक एकर म्हणजे किती फुट × किती फुट?

एक एकर म्हणजे ४३५६० चौ. फुट. पुर्वीच्या काळी आपण जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो तेंव्हा आपण एफपीएस पद्धतीने ( फूट, पाऊंड, सेकंद ) मोजमापे करीत असू. जमीन मोजण्यासाठी साखळी वापरली जात असे . तिची लांबी असे ३३ फुट . १...

एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट / 1 आर म्हणजे किती क्षेत्र / 1 एकर म्हणजे किती 


एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Step-by-step explanation:

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Additional info

   १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

   १ चौ.मैल = ६४० एकर

   १ चौ.किमी = २४७ एकर


एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट?


गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.

हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर

चौरस मैल : १ चौ.मैल = ६४० एकर

चौरस किलोमीटर : १ चौ.किमी = २४७ एकर

एक एकर म्हणजे किती ?


एक एकर म्हणजे ४३५६० चौ. फुट. पुर्वीच्या काळी आपण जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो तेंव्हा आपण एफपीएस पद्धतीने ( फूट, पाऊंड, सेकंद ) मोजमापे करीत असू. जमीन मोजण्यासाठी साखळी वापरली जात असे . तिची लांबी असे ३३ फुट . १ साखळी × १ साखळी = १ गुंठा . १ एकर = ४० गुंठे

म्हणजेच १ एकर = ३३×३३×४०= ४३५६० चौ फुट .

क्ष × य = ४३५६० या त्रैराशिकात आपण किमंत टाकून एकरामध्ये क्षेत्रफळ काढू शकते . सद्ध्या मात्र आपण एमकेएस पद्धत स्विकारली आहे. ( मिटर, किलोग्रम , सेकंद ) ज्याला दशमान पद्धत संबोधले जाते . या मध्ये जमीन हेक्टर आर पद्धतीने मोजले जाते . १००मिटर × १००मिटर = १ हेक्टर .




आर म्हणजे किती जमीन



प्रश्न 1 :- आर म्हणजे किती जमीन

उत्तर:- आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. आता यामध्ये काय केलं जातं तर जमीनीच मोजमाप आहे ते मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.


प्रश्न 2 :- आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? 


उत्तर: आताच आपण पाहिला की आर म्हणजे शंभर चौरस मिटर. यालाच जर चौरस फुटामध्ये रूपांतरित केलं तर एक आर म्हणजे 1076.39 चौरस फूट इतका होतं. म्हणजे एक गुंठा बरोबर 1089 चौरस फूट. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरचे रूपांतर गुंठ्या मध्ये कसे करायचे

आरचे रूपांतर एकर मध्ये कसं करायचं?



यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो की आरचे रूपांतर एकर मध्ये कसं करायचं? आपण रूपांतर गुंठ्यामध्ये करताना जी पद्धत वापरली तीच तिथेही वापरायचे आहे आणि जे काही गुंठ्यात उत्तर आलेल आहे त्याला भागिले 40 करायचं आहे. अशाप्रकारे तुम्हाला आर चे रूपांतर एकर मध्ये मिळून जाईल, कारण का 1 एकर बरोबर 40 गुंठे असतात. यामध्ये काही महत्त्वाचे समीकरण आहे ते लक्षात ठेवायचे आहे.

चौरस मीटर = आर गुणिले 100 चौरस फूट = आर गुणिले 1076.39

गुंठा = आर गुणिले 1076.39/1089 एकर = आर गुणिले 1076.39/1089/40 या पद्धतीने आपण आरच रूपांतर चौरस मीटर, चौरस फूट, गुंठा आणि एकर मध्ये करू शकतो.

1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी

1 मी x 1 मी = 1 चौ मी

जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो. उदा- 10 मी x 10 मी ची जमीन यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.

आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?

जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे आर = चौरस मीटर / 100

यानंतर महत्वचा प्रश्न आहे आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?

1 आर म्हणजे 100 चौ मीटर जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात. 1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे ने आणि 1089 ने भागायच. आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.

गुंठा = आर x 1076.39 / 1089

जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.

चौरस मीटर = आर x 100

चौरस फुट आर x 1076.39

गुंठा = आर x 1076.39 / 1089

एकर = आर x 1076.39 / 1089 / 40

1 गुंठा = 1089 चौ फुट

1 आर = 1076.39 चौ फुट 1 एकर = 40 गुंठे

सरकारी जमीन मोजणी कशी करावी याची माहिती

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे


शेतकऱ्याची शेती जमीन किती आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या असलेल्या सातबारा यावरून कळते.
परंतु बऱ्याचदा भावाभावांमधील वाटण्या झाल्यानंतर ज्या जमिनी प्रत्येकाच्या वाट्याला दिल्या जातात या एक प्रकारे अंदाजे दिल्या जातात.
कालांतराने या वाटण यावरून वाद उद्भवू शकतात. एखाद्यावेळेस सातबारावर असलेल्या नमूद असलेल्या जमिनीपैकी प्रत्यक्षात कमी जमीन आढळते.
त्यावेळेस शेतजमीनीची मोजणी करणे फायद्याचे असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेत जमिनीच्या मोजणी विषयीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत पुरेशी माहिती नसते. या लेखात आपण शेत जमिनीविषयीचा अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दलसविस्तर माहिती घेणार आहोत. 'जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे'

 

 शेतजमीन मोजणीसाठी आवश्यक अर्ज आणि लागणारी कागदपत्रे

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीविषयी काय शंका निर्माण झाल्यास किंवा काही वाद निर्माण झाल्यास तालुकास्तरावरील भूमी अभिलेख कार्यालय किंवा उपाध्यक्ष भुमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो.

शेतजमीनीची मोजणीसाठी लागणारा अर्जचा नमुना हा भुमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

 शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा

 सर्वप्रथम भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणीसाठी असलेला अर्ज घेऊन तो तालुक्यातील कार्यालयात जमा करावा.

त्यानंतर अर्ज भरताना पहिल्यांदा तालुका आणि आपल्या जिल्ह्याचे नाव नमूद करावे. त्याच्यानंतर पर्याय पुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी.

या अर्जामध्ये आपले स्वतःचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हाविषयी संपूर्ण माहिती भरावी.  त्यानंतर पुढचा तपशील येतो.

मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मुलगी प्रकाराचा तपशील या पर्यायांमध्ये मोजणी किती कालावधीत करायचे. 

त्या मोजणी मागचा उद्देश काय आहे हे नमूद करावे लागते.  यामध्ये आपल्या तालुक्याचे गावाचे नाव व्यवस्थितरित्या नमूद करावे.

आपल्या शेतजमिनीचा जो गट नंबर आहे त्याचा तपशील भरावा.

 

जमीन मोजण्याचा प्रकार

जमीन मोजणीच्या प्रकारांमध्ये साधारणतः कालावधीनुसार तीन प्रकार पडतात.

 

1 साधारणत सहा महिने कालावधी असलेली साधी मोजणी

2- तीन महिने कालावधी असलेली तातडीची मोजणी

3- दोन महिने कालावधी असलेली अति तातडीची मोजणी. हे तीन प्रकारे शेतजमीन मोजली जाते.

कालावधीनुसार एक हेक्टर जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क

 

साध्या मोजणीसाठी एक हजार रुपये लागतात. तातडीची मोजणीसाठी २ हजार रुपये आणि अति तातडीची मोजणी ३ हजार रुपये अशाप्रकारे जमीन मोजण्याचे दर आहेत. 

त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना कालावधी कॉलममध्ये किती कालावधीत नोंदणी करायची आहे ते लिहावे.

कोणत्या कारणासाठी जमीन मोजणी करायची आहे तो उद्देशही लिहावा लागतो.

 

या अर्जामध्ये तिसरा पर्याय येतो तो,  म्हणजे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी या पर्यायांमध्ये मोजणीसाठी लागणारे शुल्क रक्कम त्यासाठी लागणारे चलन किंवा पावती क्रमांक अथवा दिनांक लिहावा. 

या जाती चौथा पर्याय म्हणजे सातबारा उताऱ्यावर जेवढे जमिनीचेसह धारक असतात, तुमच्या सातबारामध्ये इतरांची नावे असल्यास त्यांचा तपशील आणि या सगळ्यांचे संमती असल्याच्या सह्या आवश्यक असतात.

पुढच्या पाच या पर्यायांमध्ये लगतचे जमीनधारक त्यांची नावे व पत्ता लिहिणे गरजेचे आहे.  आपल्या जमिनीच्या चहूबाजूंनी म्हणजे चतुर सीमेला कोणकोणत्या शेतकऱ्यांची जमीन आहेत, त्यांची नावे नोंद करावी.

सहाव्या पर्यायांमध्ये आपण अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडली आहेत.

त्यांचे व्यवस्थित वर्णन लिहावे लागते.  त्यामध्ये मोजणी अर्ज, मोजणीची फी, चलन किंवा पावती, अलीकडील काळात काढलेला सातबारा यांचा तपशील भरावा. 

अशाप्रकारे अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करावा.

त्यानंतर सादर केलेल्या अर्जाची तपासणी करून मोजणीसाठी जी काही शुल्क लागत असेल त्यानुसार त्याचे चलन बनवून दिले जाते.

हे चलन घेऊन शेतकऱ्याची बँकेचे चलनाचे रक्कम भरावी लागते. ही पावती दिल्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर हा तयार होतो. 

आपण सादर केलेल्या अर्जाची पोच आपल्याला दिली जाते.

या पोचपावतीमध्ये आपल्या मोजणीचा दिनांक कोणता आहे.

मोजणीस कोणता कर्मचारी येणार आहे,त्यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक असा तपशील दिला जातो.


कसा काढायचा शेतकरी असल्याचा दाखला!


 

शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा

शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा ?

देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं. शेतकरी प्रमाणपत्र कायदा नेमका काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते.  (How to get agriculturist certificate from Aaple Sarkar)


शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे 
ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं


इतर कागदपत्रे

शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा सात बारा किंवा 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे.

स्वंयघोषणापत्र

शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल.

 आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवरच्या वेबसाईटवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून पुढे शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.


कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील अशी शेतजमीन खरेदी / विक्री साठी जिल्हाअधिकारी यांच्या परवानगी ची गरज नाही.


15 दिवसांमध्ये शेतकरी प्रमाणपत्र

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.