Saturday, September 16, 2023

शबरी घरकुल योजना पहा अर्जाचा नमुना, कागदपत्रे व अटी

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.
1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. 
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे. 
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील. 
4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे. 
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 

खालीलप्रमाणे :-
 अ) ग्रामीण क्षेत्र - रु. 1.00 लाख 

ब) नगरपरिषद क्षेत्र - रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र - रु. 2.00 लाख

घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
कागदपत्रे :-
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 

2. जातीचे प्रमाणपत्र 

3. रहिवासी प्रमाणपत्र 

4. 7/12 उतारा व नमुना 8-अ 

5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला 

6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र 

7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला 

8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे 

9. ग्रामसभेचा ठराव


संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प


महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अर्जाचा नमुना पाहावा.

Click here






Wednesday, September 13, 2023

तत्काळ केवायसी करा; अन्यथा सहा हजार कायमचे विसरा



पालघर जिल्ह्यात १५ हजार २३३ ई-केवायसीसाठी प्रलंबित
पालघर : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे अनिवार्य आहे. वारंवार सांगूनही सर्वच जिल्ह्यात है न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ई-केवायसी आणि आधार सिडिंगसाठी अखेरची मुदत दिली आहे. यानंतर पीएम किसानच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून ही नावे वगळली जाणार आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १३ हजार ९३४ बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी, तर १५ हजार २३३ ई-केवायसी करणे प्रलंबित आहेत.

ज्या शेतकरी लाभार्थीच्या या बाबी प्रलंबित आहेत, त्यांना या योजनेच्या सहा हजार रुपयांच्या १४व्या हप्त्याला तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपयांच्या लाभालासुद्धा मुकावे लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ( अंतर्गत १५व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आणि लॅण्डसिडिंग या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. असे असतानाही हजारो शेतकऱ्यांना अनेक आवाहने करूनही लाभार्थी गंभीरता दाखवत नसल्याचे दिसून आले आहे.

पीएम किसान सम्मान निधि योजना

बँक खाते आधार संलग्न करून घ्या

संबंधित लाभार्थीला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल, तर 'बँकेच्या शाखेतून खात्यास आधार संलग्न करावा किंवा नजीकच्या पोस्टमास्तर याच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते उघडावे. लाभार्थीचे जर भूमिअभिलेख नोदीप्रमाणे अद्यावतीकरण करायचे असेल

या तारखेपर्यंत केवायसी, आधार सीडिंग आवश्यक

पी.एम. किसान योजनेचे लॉगइन आयडी कृषी विभागाला प्राप्त झालेले असून, त्याच्यामार्फत अपात्र तसेच मयत लाभार्थी मार्क केले जाणार आहेत. अपात्र मार्क केलेल्या लाभार्थीकडून महसूल विभाग परतावा वसुली करणार आहे.

किती शेतकऱ्यांचे काय बाकी?

१५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १५ हजार २३३ ई- केवायसी करणे प्रलंबित आहेत.

१३ हजार शेतकऱ्यांचे आधार सीडिंग

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १३ हजार ९३४ बँक खाती आधार सलग्न करणे बाकी आहे.

ई केवायसी, आधार सीडिंग नसलेले शेतकरी

तालुका ई-केवायसी आधार सीडिंग नसलेले शेतकरी

डहाणू  ४३२८   ६८

जव्हार १६६५ २०

मोखाडा ९२९ 191

पालघर ४२११ 130

तलासरी १७२५ 01

 वाडा २४८९ ५६

वसई ३२१ 1033

विक्रमगड १५०२ 1380

या तारखेनंतर यादीतून नाव वगळणार

वारंवार संपर्ककरूनही जे लाभार्थी प्रतिसाद देत नाहीत, त्यांनाही अपात्र मार्क करून वगळले जाणार आहे.

पीएम किसानचे जिल्ह्यात १ लाख ५८ हजार लाभार्थी

जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ४२५ पीएम किसानचे लाभार्थी आहेत


त्याने आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे गावचे तलाठी अथवा संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधून सर्व बाबींची पूर्तता करावी व पीएम किसानच्या १५व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा. - नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर


Thursday, September 7, 2023

पीएम विश्वकर्मा योजना, छोट्या व्यावसायिकांना आधार PM Vishvakarma scheme


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील  मंत्रिमंडळ समितीने आज 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या  नवीन केंद्र सरकारी  योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी दिली.

हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार  आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त-कलाकार  आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Wednesday, July 5, 2023

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार


संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. 

या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. 

याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 50 वर्षावरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. 




तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.21,000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.

Friday, June 30, 2023

Maharashtra Talathi Mega Recruitment 2023 for 4644 vacancy

Talathi Bharti 2023 in a different district in Maharashtra  
, Akola, Amravati, Aurangabad, Beed, Bhandara, Buldhana, Chandrapur, Dhule, Gadchiroli, Gondia, Hingoli, Jalna, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai Suburban, Nagpur, Nanded, Nandurbar, Nashik, Osmanabad, Parbhani, Pune, Raigad, Ratnagiri, Sangli, Satara, Sindhudurg, Solapur, Thane, Wardha, Washim, Yavatmal & Palghar).
जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

 पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- 
मागासवर्गीय:₹900/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 

परीक्षा:नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: Click Here

जाहिरात : Click Here

Online अर्ज: online application