Pages

Pages

Pages

Saturday, June 3, 2023

PM Kisan Yojana च्या आधार जोडणीसाठी टपाल बँकेची विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. हा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी तसेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी सलंग्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय टपाल बँके (आयपीपीबी) मार्फत गाव पातळीवर मोहिम राबविण्यात येत आहे.. या मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या  लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषि अधिकारी  यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे ६ हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ माहे जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान अँप द्वारे मोबाईलवर चेहरा प्रमाणीकरण प्रणाली (फेस आँथेटिकेशन) द्वारे योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थींना स्वतःचे तसेच इतर ५० लाभार्थीचे सुद्धा ई केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे.
 जिल्ह्यात सद्यस्थितीत लाभार्थ्यांची बँक खात्यांशी आधारक्रमांक जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल.

सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुख करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब् असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्या गरजही पडणार नाही.

No comments:

Post a Comment