कोरोनापासून बचावासाठी होम क्वारंटाईन’ किंवाहॉस्पिटल क्वारंटाईन’ हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत.कोरोना’ संसर्गानं हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं होम क्वारंटाईन’ व्हावं,स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावंअसं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतीलअसा इशाराही  त्यांनी दिला आहे.

कोरोनाबाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय. भाजीबाजारातल्या गर्दीमुळे कोरोना तुमच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.कोरोनासंदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेलत्याची सुरुवात काल झाली आहेअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखानेहॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत, त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईलअसेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. 

राज्यात अन्नधान्याचा,  खाद्यतेलाचा,दूधभाजीपाल्याचाऔषधांचा,इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये. त्याला परवानगी दिली जाणार नाहीअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तिभावानंसाधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही  सर्व सणउत्सव साधेपणानं साजरे व्हावेतअसं आवाहनही त्यांनी केलं आहे.