Friday, June 30, 2023

Maharashtra Talathi Mega Recruitment 2023 for 4644 vacancy

Talathi Bharti 2023 in a different district in Maharashtra  
, Akola, Amravati, Aurangabad, Beed, Bhandara, Buldhana, Chandrapur, Dhule, Gadchiroli, Gondia, Hingoli, Jalna, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai Suburban, Nagpur, Nanded, Nandurbar, Nashik, Osmanabad, Parbhani, Pune, Raigad, Ratnagiri, Sangli, Satara, Sindhudurg, Solapur, Thane, Wardha, Washim, Yavatmal & Palghar).
जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

 पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- 
मागासवर्गीय:₹900/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 

परीक्षा:नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: Click Here

जाहिरात : Click Here

Online अर्ज: online application


Tuesday, June 20, 2023

पीएम किसान ई केवायसी करून घ्यावे शेतकऱ्यांनो

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून यासाठी  प्रत्येक गावांमध्ये कृषि विभागामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शिबिरात सहभागी होवून बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

कृषि आयुक्तांच्या आदेशानुसार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी  गावोगावी कृषि सहाय्यकांमार्फत सकाळी 8 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. 

या शिबिरामध्ये कृषि विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट, बँका तसेच सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) सहभागी होणार आहेत. या शिबिराची पूर्वतयारी कृषि विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषि सहाय्यकांना गावे वाटप करून त्यांच्याकडे प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रलंबित लाभार्थ्यांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन त्यांची ई-केवायसी करण्यासाठी कृषि विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर्स कॉर्नर’मधील ई-केवायसी – ओटीपी आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (सीएससी)च्या मदतीने अथवा प एम किसानच्या नवीन अॅपद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. 

तसेच संबंधित लाभार्थ्याला बँक खाते आधार संलग्न करायचे असल्यास विशेष शिबिरामध्ये बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार क्रमांक संलग्न करावा. या शिबिरावेळी पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Thursday, June 15, 2023

शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत राज्यात 35 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला

पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाध्ये रोजगार मेळावा देखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यपुर्वी देखील असे कार्यक्रम काही जिल्ह्यात झाले आहे. राज्यांमध्ये 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना  या अभियानाच्या माध्यमातून पोहचविल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत योजना पोहचणार नाही तोपर्यंत सरकार काम करीत राहिल सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षाभरापुर्वी स्थापन झाले या सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्तीक लाभ होईल असा निर्णय या शासनाने घेतला नाही शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू  मानून हे शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ पालघर जिल्हा कार्याक्रमाचा शुभारंभ कोळगाव, पालघर येथे आयोजीत करण्यात अला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत हाते
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूर, श्रीनिवास वनगा, क्षितीज ठाकूर, विवेक पंडित, निरंजन डावखरे,  रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी जिल्हाधिकारी डॉ. कीरण महाजन, पालघरच्या नगरध्यक्षा उज्वला काळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनीधी आणि लाभार्थी उपस्थित होते.


पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालयाचे भूमिपूजन, जलजिवन मिशनचे ई-भूमिपूजन करण्यात आले. सर्व सामान्याच्या जिवनामध्ये बदल घडविणे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणने सर्व सामान्याच्या जिवनामध्ये सकारात्मक अमुलाग्र बदल घडविणे हाच उद्देश शासनाचा आहे. सर्व सामान्य नागरीकांसाठी या शासनाने जवळपास चारशे निर्णय घेतले आहेत. अनेक लोकाभिमूख प्रकल्प होताहेत उद्योग वाढीसाठी अनेक निर्णय घेतले आहे. त्यासाठी रेड कार्पेट देण्यात आला आहे. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावले पाहिजे. इतर सर्व सामान्य जनतेचे जिवनमानात देखील बदल घडविण्याचा उद्देश शासनाचा आहे. बांद्रा-वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे पुर्वी जे प्रकल्प राबविण्यात आले नव्हते ते सर्व प्रकल्प या शासनाने चालू केले आहेत.
मुंबईसह महाराष्ट्राचे सर्व पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरु आहेत. मागील 11 महिन्यामध्ये परदेशी थेट गुंतवणकी मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. प्रथमच मागच्या मंत्रीमंडळ बैठकी मध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये मच्छीमार बांधवासाठी तरतूद करण्यात आली. पंचामृत अर्थसंकल्पामध्ये सर्व समावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यातील पोलीस विभागाने देखील रोजगार मेळावा घेतला दहा हजार तरुणांनी सहभाग  नोंदविला होता या रोजगार मेळाव्यात 1 हजार 850 तरुणांना रोजगार मिळाला आहे. पोलीस दलाने कायदा सुव्यवस्था राखण्या बरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे.

 महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. लेक लाडकी लखपती या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्या बरोबर एक लाख रुपयाचे अनुदान जाहिर करण्यात आले. शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार 6 हजार अनुदान देते तर राज्य शासन 6 हजार असे एकुण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बाधवांना देण्यात येत आहे. मागील शासनाच्या काळात 2014 ते 2019 या कालावधीमधील लोकाभिमुख प्रकल्प बंद करण्यात आले होते त्या सर्व योजना पुन्हा सुरु करण्यात आल्या त्याचा फायदा जनतेला होत आहे केंद्र शासनाचा भक्कम पाठींबा राज्य शासनाला असल्यामुळे आपण सर्व महत्वकांशी प्रकल्प पुढे नेत आहोत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 
जागतिक स्तरावरील सर्वेनुसार लोकप्रिय नेत्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 84 टक्के लोकांनी पसंती देऊन त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. या देशाचा सन्मान जागतिक स्तरावर राखण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी केले आहे. या देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. यांचे सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांना जाते.
 पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी यांनी सुचविलेले प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएची व्याप्ती देखील सपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात सर्वात प्रशस्त इमारत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगिले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लांभार्थ्यांना विविध वस्तंचे वाटप करण्यात आले.

तळागळापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहचविणार
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून एका छताखाली सर्व योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतू पालघर जिल्ह्याने दोन लाखाच्या वरती लाभार्थ्यांना लाभ देऊन हे अभियान यशस्वी केले आहे.
सामान्यासाठी काम करणारे हे सरकार सामान्यांच्या जिवनात गुणात्मक बदलासाठी काम करत आहे. जो पर्यंत योजनांचा लाभ तळागळातील जनतेपर्यंत पोहचणार नाही. तोपर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ‘नमो शेतकरी’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात पिक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला. आज पालघरमध्ये जिल्हा रुग्णालयाचे भूमीपुजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्याला 5 हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात रुग्णालय उभी केली जात आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनअंतर्गत दिड लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जात होते. परंतु आता 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. त्यामुळे कोणताही गरजु लाभार्थी उपचाराविना रहाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी 5 लाख घरे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. याची संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची सुचना देखील यावेळी त्यांनी केली. केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर ओबीसी बांधवांसाठी देखील पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत ओबीसी बांधवांसाठी 10 लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. 
महिला करिता 50% एस.टी. सवलत देण्यात आली. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. म्हणून 1 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. निलक्रांतीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मासेमारी करिता शितपेट्या, आधुनिक गाड्या उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आदीवासी मुलांना शाळेत असतांनाच त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखिल यावेळी श्री. फडणवीस म्हणाले. 

जनतेची उपस्थिती या अभियानाची यशस्वीता दर्शवत आहे
-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

 केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की पालघर जिल्ह्याच्या दृष्टीकोणातुन शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ या जिल्ह्यात होणे म्हणजे सुवर्णाक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून देशात अनेक योजनांचा लाभ डीबीटी च्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे सांगुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की राज्याच्या विकासासाठी विविध योजना ह्या मैलाचा दगड ठरत आहेत. शासन आपल्या दारी या योजनेच्या शुभारंभा करीता उपस्थिती जनतेची उपस्थिती ही योजनेची यशस्वीता दर्शविते.  


‘शासन आपल्या दारी’ हे अभियान जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे राबविले
  -पालकमंत्री रविंद्र चव्हाण                           
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून दोन लाख गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळणयाकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहिलेली शासन आपल्या दारी हे स्वप्न पुर्ण करण्याकरिता राबत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल 
ते म्हणाले की पालघर जिल्हा हा सागरी, डोंगरी आणि नागरी असल्याने विविध अडचणीचा सामना करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहेत. यात जतनेदेखील सहकार्य करने गरजेचे आहे. जिल्ह्यात सामाजिक एकोपा रहावा म्हणून पोलीस दलाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनसंवाद हा उपक्रम राबवून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याकरिता जो प्रयत्न केला त्याकरिता पोलीस दलाचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


Wednesday, June 14, 2023

शिष्यवृत्ती हुकलेली संधी पुन्हा मिळेलऑफलाईन अर्ज १५ जूनपर्यंत करावे

 


महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्यािंना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुलक या योजनेचा लाभ दिला जातो . सन २०१८-१९ ते २०२१-२२ या वर्षात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज केले होते. मात्र, यावेळी काही पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ॲटो रिजेक्ट झाले होते त्यामुळे ते शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अता प्रलंबित अर्ज ऑफलाईन पध्दतीने निकाली काढले जाणार आहेत.

पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्याचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरताना अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही.

अशा विध्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज १५ जून २०२३ पर्यंत महाविद्यालयाकडे जमा करावा तसेच महाविद्यालयाने २० जून पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, या कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाधान   यांनी केले आहे.


शासन आपल्या दारी उपक्रमाचा पालघर जिल्हयात


शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

पालघर येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी गुरुवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालघर सिडको मैदानात सभामंडप उभारण्यात आला आहे. सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा कार्यक्रम १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी विविध दस्तावेज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी' हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक आहे. लाभार्थीना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे लाभार्थी या उपक्रमापासून वंचित होते, अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विश्वास फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. पालघर तालुक्यातील सुमारे २० गावांतील पाच हजार लाभार्थीसाठी गावागावात शिबिरे आयोजित करून त्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी निःशुल्क मदत विश्वास फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून शेतकरी, मच्छीमार, बेरोजगारांना रोजगारासाठी मार्गदर्शन करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी शासनाच्या आवश्यक व पूरक योजना देण्यात येत आहे.

योजना काय काय असतील

कृषी सेवा केंद्राचे परवाने
सेवानिवृत्त लाभ
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
ई-श्रम कार्ड
भरती मेळावा
पीएम किसान
विवाह नोंदणी
पीएफ घरकुल योजना
मनरेगा
जॉब कार्ड
मुलींना सायकल वाटप
नवीन मतदार नोंदणी
शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
कृषी प्रदर्शन
डिजिटल इंडिया
सखी किट वाटप
दिव्यांग साहित्य वाटप
शिकाऊ चालक परवाना
या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि Shasan Aplya Dari योजनांचा लाभ घेऊ शकतात.

Monday, June 12, 2023

चक्रीवादळ बिपरजॉय सर्व नागरिकांना जाहीर आवाहन


चक्रीवादळ- Biparjoy (बीपरजॉय)
चक्रीवादळ बिपरजॉय- बिपरजॉय हे नाव बांगलादेशाने दिले आहे. त्याचा अर्थ आपती असा आहे. IMD वेबसाइटनुसार, हे जागतिक हवामान संघटना (WMO) देशांनी स्वीकारले आहे.

चक्रीवादळची पुढील ६ दिवसाची संभावित स्थिति

दिनांक  १०.०६.२०२३    ११.०६.२०२३  १२.०६.२०२३   १३.०६.२०२३  १४.०६.२०२३  १५.०६.२०२३

वेळ (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ११:३०  ११:३०   १२:३० 

२३.३० २३:३० २३.३० २३:३०
वाऱ्याची गती (प्रती कि.मी.)

-१६५.१७५ १५०-१६० २३५.१४५ ११५-१२५ १५.१०५


(भारतीय प्रमाण वेळेनुसार)  २३.३० २३:३० २३.३० २३:३०

वाऱ्याची गती (प्रती कि.मी.)

१६५-१७५ १५५-१६५ १४५-१५५ १२५.१३५ १०५-११५

चक्रीवादळची दिशा किंवा पातळी  Very Severe Cyclonic Storm -SevereCyclonic Storm

महाराष्ट्रातील किनारा भागतीलअंतर (कि.मी) दि. १०/०६/२०२ वेळ ३ १८.००

6) सिंधुदुर्ग ६७५ कि. मी

7) रत्नागिरी- ६४० कि.मी

8) रायगड ६०७ कि.मी

9) मुंबई ६०३ कि.मी

10) पालघर- ६२३ कि. मी

सूचना

मच्छीमारानी खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. मच्छीमारीसाठी गेले असल्यास सुरक्षित स्थळी किवा बंदरात परत यावे.

किनारी भागातील लोकांनी सतर्क बाळगावी.

स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाच्या सुचनांचे पालन करावे

माहिती खोत: सदरची माहिती ही भारतीय हवामान विभागाच्या प्रसिद्धी पत्रकातून तसेच संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.

Wednesday, June 7, 2023

The chance of career in the art field कला क्षेत्रात करियरच्या संधी…

आपल्याला जो छंद आहे किंवा उपजत जी कला आहे, त्यात करियर करायचा विचार फारसा रूढ नव्हता. जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता आता छंद जोपासता असताना किंवा तुम्हाला उपजत असलेल्या केलेला प्रोफेशन बनवू शकता. ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सिमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे. आपल्या आवडत्या कलेतून छंद करण्यासंदर्भातील बॅचलर इन फाईन आर्ट्स मधील काही शिक्षणक्रम पाहू -
बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, साधारण 3 लाख शैक्षणिक शुल्क आहे. यामध्ये अनेक उपविभाग असून, पदवी आणि पदविका शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत.
बी.एफ.ए. इन ॲनीमेशन - चार वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिझाईन फॉर ॲनीमेशन, प्रिंट मेकींग, फॉर बिझनेस लॅग्वेज, ओपन इलेक्टीव्ह कोर्सेस हे विषय अभ्यासक्रमात असून, साधारण 3 लाख शिक्षणक्रम शुल्क आहे.

बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स + मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (पेंटींग) - हा सहा वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी मध्ये किमान 45 टक्के असणे आवश्यक आहे.
बी.एफ.ए. इन म्युसिक व्हायोलीन - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. या प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम.फील. इन म्युझीक - एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन. म्युझीक - हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम.ए. इन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक- हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. म्युझिक मधून बी.ए.पूर्ण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन पफॉर्मिंग आर्ट्स- हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. साधारण 2 लाख शैक्षणिक शुल्क आहे.

कोर्स इन म्युझिक - हा 120 तासांचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. शिक्षणक्रम शुल्क 4 हजार रूपए आहे. टेक महिंद्रा, एशियन पेंट, विप्रो, झोमॅटो आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
डिप्लोमा इन हिंदूस्थानी क्लासिकल व्होकल / लाईट व्होकल / सितार / तबला - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

गाणे विषयात पदविका (डिप्लोमा इन सिंगींग) - हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 4 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.
सर्टीफीकेट इन व्हाईस कल्चर / व्हाईस ओव्हर / डबिंग ॲण्ड फ्री कमेंट्री - हा तीन महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 30 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.

नृत्यकलेत पदवी - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. याचे एक लाख 75 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे. बँक ऑफ अमेरिका, विप्रो, गुगल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
सर्टीफीकेट इन फाउंडेशन फोटोग्राफी - हा दोन महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 13 हजार शैक्षणिक शुल्क आहे. प्राईम फोकस, रिलायन्स रिटेल, लाईफ ओके आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन ऑटोमोटीव्ह शिल्पकला - हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 5 लाख रूपए शैक्षणिक शुल्क आहे. अँकर पॅनासोनिक, इंदी डिझाईन, बॉम्बे डिझाईन हाऊस, बँग डिझाईन आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
एम.एफ.ए. इन सिरॅमिक - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीमध्ये किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे.

बी.एफ.ए. इन सिरॅमीक - चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम असून, 12वी मध्ये 50 टक्के असणे आवश्यक आहे.
एम.एफ.ए. इन पेंटींग (भित्तीचित्र) - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

सर्टीफीकेट इन ॲक्टींग - हा सहा महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, 90 हजार रूपए शैक्षणिक शुल्क आहे.

भारतात 35 महाविद्यालयात ड्रामा (नाटक) विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. शिल्पकलेचे 21 महाविद्यालय भारतात आहेत. फोटोग्राफीचे 271 महाविद्यालये आहेत. भारतात संगीताचे 113 महाविद्यालये आहेत. एम.एफ.ए. इन पेंटींगचा शिक्षणक्रम वीस्वा भारती विद्यापीठ, वेस्ट बंगाल येथे उपलब्ध आहे. ग्राफीक आर्ट कॉलेजचे 46 महाविद्यालये आहेत. नृत्य आणि नृत्य दिग्दर्शनचे भारतात 51 महाविद्यालये आहेत.

Saturday, June 3, 2023

PM Kisan Yojana च्या आधार जोडणीसाठी टपाल बँकेची विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. हा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी तसेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी सलंग्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय टपाल बँके (आयपीपीबी) मार्फत गाव पातळीवर मोहिम राबविण्यात येत आहे.. या मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या  लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषि अधिकारी  यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे ६ हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ माहे जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान अँप द्वारे मोबाईलवर चेहरा प्रमाणीकरण प्रणाली (फेस आँथेटिकेशन) द्वारे योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थींना स्वतःचे तसेच इतर ५० लाभार्थीचे सुद्धा ई केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे.
 जिल्ह्यात सद्यस्थितीत लाभार्थ्यांची बँक खात्यांशी आधारक्रमांक जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल.

सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुख करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब् असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्या गरजही पडणार नाही.