Tuesday, June 30, 2020
Friday, June 26, 2020
ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना नोकऱ्या देणार ठाकरे सरकार
याबाबत माहिती देताना राज्याचे कौशल्य विभाग मंत्री नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विभागामार्फत rojgar.mahaswayam.gov.in or www.mahaswayam.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवार आपल्या आवडीनुसार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. याद्वारे, बेरोजगार तरुणांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते, त्याचबरोबर त्यांना राज्यातील कामगार कमतरता दूर करण्यातही यश मिळू शकेल.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेने अशी मागणी केली आहे की राज्यातील 80 टक्के रोजगार स्थानिक तरुणांना देण्यात यावा आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे नोंदणी करावी.
पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन
Wednesday, June 24, 2020
गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी
घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आज कोरोना मृत्यू 4, नवे पॉझिटीव्ह 199!
दि. 23 जून 2020: आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 4 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 99 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 105 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यामध्ये आज नव्या 199 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील विक्रमगड तालुक्यातून 15, जव्हार तालुक्यातून 12, वाडा तालुक्यातून 7, डहाणू तालुक्यातून 3, मोखाडा तालुक्यातून 2, पालघर तालुक्यातून 1 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 159 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत.
डहाणू तालुक्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू
Tuesday, June 23, 2020
स्थलांतरीत मजुरानीं त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी.-जिल्हाधिकारी
Monday, June 22, 2020
पालघर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह 202 ने वाढले व कोरोना मृत्यू 101
दि. 22 जून 2020: पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात कोरोनाची आकडेवारी सतत वाढत असून, जिल्ह्याचा ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही. आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 3 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 95 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 101 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यामध्ये आज नव्या 202 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील मोखाडा तालुक्यातून 8 व जव्हार आणि वाडा तालुक्यातून प्रत्येकी 5 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 184 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज 58 कोरोना बाधीत पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Sunday, June 21, 2020
पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधीत 2629, बरे झाले 1482 मृतांची संख्या 97!
दि. 21 जून: पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 97 वर पोहोचला असून त्यातील एकट्या वसई तालुक्यातील मृतांची संख्या 91 आहे. वसई विरार महानगरातील 85 व ग्रामीण वसईतील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यातून 4 व वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजची कोरोना बाधितांची आकडेवारी:
वसई विरार महानगर क्षेत्र – 2041 (85 मृत्यू)(1168 बरे झाले)
वसई ग्रामीण तालुका – 93 (6 मृत्यू) (65 बरे झाले)
पालघर तालुका – 168 (4 मृत्यू) (107 बरे झाले)
वाडा तालुका – 134 (1 मृत्यू) (55 बरे झाले)
विक्रमगड तालुका – 64 (1 मृत्यू) (42 बरे झाले)
डहाणू तालुका – 67 (41 बरे झाले)
जव्हार तालुका – 45 (4 बरे झाले)
मोखाडा तालुका – 9
तलासरी तालुका – 8
आज 5 नवे कोरोना पॉझिटीव्ह
दि. 21: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आज 5 नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून त्यामध्ये, डहाणू तालुक्यातील 3 व वाडा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील 3 रुग्णांपैकी 1 कासा पोलीसांच्या ताब्यातील कैदी असून तो मुंबईचा आहे. 1 दापचरी व 1 जामशेत येथील आहेत. तर वाडा तालुक्यातील 1 रुग्ण कुडूस येथील व 1 उमरोठे येथील आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन
Friday, June 19, 2020
मन, स्वभाव व ताणतणाव
उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर इच्छुकांना एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती
संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 18 : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.
खाजगी, शासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध
बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.
उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती
संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.
संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा
पालघर जिल्हा: आज 5 मृत्यू , नवे 20 पॉझिटीव्ह
पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना मुळे 5 मृत्यू झाले असून त्यातील 4 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून वाडा तालुक्यात पहिला मृत्यू उद्भवला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 81 झाली आहे.
आज जिल्ह्यात 20 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यामध्ये जव्हार 6 (जव्हार शहर 4 व जांभूळ विहीर 2), वाडा 6 (वाडा नगरपंचायत 5 व चाम्बळे 1), डहाणूत 5 (डहाणू शहर 3, थर्मल पॉवर स्टेशन 1, वाणगांव- विक्रमनगर 1), पालघर 2 (बोईसर बीएआरसी 1, शिगांव 1) व विक्रमगड तालुक्यातील 1 (झडपोली) कोरोना बाधीताचा समावेश आहे.
Thursday, June 18, 2020
विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी-जिल्हाधिकारी
Wednesday, June 17, 2020
🏥कोरोना अपडेट जिल्हा पालघर ग्रामीण
पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन शेतीशाळा,बांधावर तूर लागवड,पिक विमा योजना अंतर्गत शेतकरीना मार्गदर्शन
कुपोषित बालके, गरोदर माता यांना उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
Tuesday, June 16, 2020
दिवसभरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 47 नवे पॉझिटीव्ह
आज 47 नवे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये एकट्या वाडा तालुक्यातील 27 व जव्हार तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यात 2 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून विक्रमगड येथे 1 व डहाणू तालुक्यात (वाणगांव) 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
|| NIFT मध्ये *कलाकार आणि पाल्यांसाठी प्रवेश* ||
Unlock 1.0 | शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करणार. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Monday, June 15, 2020
पालघर जिल्हा पूर्णपणे बंद करण्याचे कुठलेही आदेश नाहीत! – जिल्हाधिकारी
पालघर, दि. 15 जून: ” पालघर जिल्हा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ” अशी हेडलाईन एका वृत्तवाहिनीवर झळकल्याचा मॅसेज सोशल मिडीयावरुन प्रसारित होत आहे. तथापि हा फेक मॅसेज असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. वृत्तवाहिनीच्या बॅनरचा गैरवापर करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई करावी, तसेच संबंधित वृत्तवाहिनीने देखील तक्रार नोंदवावी असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

डहाणूतील कोरोना वॉरिअरचे 11 कुटूंबीय पॉझिटीव्ह
डहाणूतील नरपड येथील एका परिचारिकेच्या कुटूंबातील 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही परिचारिका वसई विरार महानगर क्षेत्रातील रुग्णालयाच्या सेवेत कार्यरत आहे. तीचा 12 जून रोजी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर निकटच्या संपर्कातील 20 जणांना क्वारन्टाईन करुन घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता, 11 कुटूंबीयांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये 4 स्त्रीया व 7 पुरुषांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील कोरोना +Ve व्यक्तींची संख्या आता 55 झाली असून, त्यातील 20 जण बरे झाले आहेत.
“ कोरोनामुक्त ग्रामपंचायत ” असा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम
Sunday, June 14, 2020
रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर
कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राज्यातील रक्तसाठा कमी होत होता. गर्दी टाळणे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रक्तदान शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन झले नाही. काही ठिकाणी सुरक्षित अंतराचे काळजी घेत रक्तदान शिबीरे झाली. राज्यातील जनतेला संबोधताना वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसादही मिळाला.
आता राज्यातील लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. कोरोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना ते वेळेवर मिळावे यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबीरासोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
या उपक्रमात राज्यभरातील सुमारे ७१ शासकीय रक्तपेढ्या फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येतील. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासली तर ती पेढी फेसबुकच्या पेजवर तशी मागणी करेल. त्यानंतर फेसबुकमार्फत संबंधीत रक्तपेढीच्या विभागातील, शहरातील रक्तदात्यांना (ज्यांची आधीच फेसबुकवर नोंदणी झाली आहे) रक्तदानाबाबत संदेश दिला जाईल आणि कुठल्या रक्तपेढीत जाऊन कुठल्या गटाचे रक्त द्यायचे याची माहिती दिली जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
Lockdown: मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी मनसे सज्ज; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं लॉन्चिंग
तलासरी तालुक्यातील बाजारपेठ बंद
तहसीलदार कार्यालय तलासरी यांच्याकडून आदेश देण्यात आले की, मा. नगराध्यक्ष/ उपाध्यक्ष / नगरसेवक यांना कळवण्यात येते की सध्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यास दि. 15/06/2020 ते 17/06/2020 रोजीपर्यंत तलासरी नाक्यावरील बाजारपेठ बंद करण्यात येत आहे. तसेच तलासरी तालुक्यातील व्यापारी लोकानी व सामान्य लोकांनी सहकार्य करावे.
जिल्हाधिकारी यांनी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी करावा असे आवाहन
पालघर जिल्ह्यात आज 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू व नवे 132 पॉझिटिव्ह
Saturday, June 13, 2020
वसई विरार महानगरपालिका, पालघर
- अंतिम तारीख: 16 जून 2020
- एकूण पदे: 212 पदे
- वयोमर्यादा: 50 वर्षे
- अधिकृत वेबसाईट : click here
- जाहिरात पीडीएफ: Click here
- मुलाखतीचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला ,प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत विरार (पूर्व)
VVCMC Bharti 2020
| ?Department (विभागाचे नाव) | Vasai Virar Mahanagarpalika, Palghar |
| ⚠️ Recruitment Name | Vasai Virar City Municipal Corporation Bharti 2020 |
| ? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-In-Interview |
| ? Official Website (अधिकृत वेबसाईट) | Offline Application Form |
Vacancy Details Of VVCMC Recruitment 2020:
| Sr. No. | Name of Post | Qualifications | No.Of Vacancy |
| 01 | Medical Officer- Physician | MD Medicine | 10 |
| 02 | Medical Officer – Anesthetists | MD Anesthetists | 10 |
| 03 | Medical Officer- MBBS | MBBS | 30 |
| 04 | Medical Officer- BAMS | BAMS | 30 |
| 05 | Medical Officer- BHMS | BHMS | 30 |
| 06 | GNM | 12th+General Nursing and Midwife Diploma | 30 |
| 07 | ANM | 12th, ANM Completed | 50 |
| 08 | Pharmacist | 12th Science, D.Pharm | 10 |
| 09 | Laboratory Assistant | 12th, DMLT | 07 |
| 10 | X-Ray Technician | 12th, Completed Study in X-ray Technician | 05 |
तलासरी व मोखाड्याने देखील खाते खोलले! मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नवे पॉझिटिव्ह!
Friday, June 12, 2020
आज ग्रामीण भागात 35 नवे कोरोना रुग्ण; त्यात 25 स्त्रीयांचा समावेश! कालच्या 66 रुग्णांमध्ये 38 स्त्रीया!

दि. 12 जून : काल पालघर जिल्ह्यामध्ये एका दिवसांत 108 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यातील 42 वसई विरार महानगर क्षेत्रातील तर 66 पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होते. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागातील 66 रुग्णांमध्ये 38 स्त्रीयांचा समावेश आहे. आज वसई महानगर क्षेत्रातील कोरोनाबाधीतांची संख्या समजू शकली नसली तरी, ग्रामीण भागात 35 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील तब्बल 25 स्त्रीया आहेत.

