लेख थोडा मोठा असला तरी अवश्य पूर्ण वाचा.
मन
मानवी मनाचे तीन भाग असतात
◆व्यक्त मन (Conscious Mind):- मनाच्या या भागातील विचार व भावना आपल्याला सहजी अनुभवता येतात.
◆अव्यक्त मन (Unconscious Mind):-मनाच्या या भागामधील विचार व भावना आपल्याला सहजासहजी अनुभवता येत नाहीत. अनेक प्रकारच्या मानसिक अस्वस्थता याच भागातून निर्माण होतात.
◆अर्धव्यक्त मन (Subconscious Mind):- काँशियस माइंड व अंकाँशियस माइंड या मधील ब्रिज म्हणजे सबकाँशियस माइंड. या भागामध्ये दोन्ही भागांच्या विचार व भावनांचे मिक्सर चालू असते.
मानवी मनाच्या स्वास्थ्यासाठी या तिन्ही भागांचा समतोल राखणे अतिशय महत्वाचे असते. यामधील कुठलाही असमतोल मानसिक अस्वस्थता निर्माण करतो.
स्वभाव
प्रत्येक व्यक्तीची स्वतःला व आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना हाताळण्याची विशिष्ट अशी पद्धत असते, या पद्धतीला त्या व्यक्तीचा स्वभाव असे म्हंटले जाते.
स्वभावाचे दोन भाग असतात.
◆Temperament :- नैसर्गिक रित्या आनुवंशिक भेटलेला भाग म्हणजेच टेम्परामेन्ट
◆Character:- व्यक्तीला त्याच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांमधून घडणारा भाग म्हणजेच कॅरॅक्टर
जसे लहान बाळाचे टेम्परामेन्ट आपल्याला लगेच समजते उदा. काही बाळ लहान पणापासून शांत असतात तर काही चंचल तर काही अस्वस्थ व चिडचिडी असतात.
लहानपणापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आपल्याला वेगवेगळे असे अनेक अनुभव येत असतात. या अनुभवामधून आपल्या कॅरॅक्टर मद्धे वेळोवेळी अनेक बदल घडून येत असतात.
व्यक्तीची स्वप्रतिमा, ताणतणाव हाताळण्याची पद्धत, विविध अनुभवांना सामोरे जाण्याची पद्धत, इतर लोकांशी वागण्याची पद्धत अशा सर्व गोष्टींवरून व्यक्तीचा स्वभाव ठरत असतो.
आदर्श स्वभाव वास्तवात असणे अशक्य आहे असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात दोष हा असतोच.
ताणतणाव
ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. स्ट्रेस म्हणजे प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कमी पडते , तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ताणतणाव असे म्हणतात.
सध्या बहुतेक लोकांचे आयुष्य हे गतिमान झाले आहे व स्पर्धा ही खूप वाढली आहे. या दोन्ही गोष्टींचा स्वाभाविकच परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला होऊन ताणतणाव वाढत आहेत. तसेच कौटुंबिक ताणतणाव, भौतिक सुखाच्या मागे लागणाऱ्या सध्याच्या संस्कृतीमुळे उदभवणारे ताणतणाव व इ. अश्या अनेक प्रकारच्या ताणतणावांना बऱ्याच लोकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार स्ट्रेस हाताळण्याची क्षमता ही भिन्न भिन्न असते त्यामुळे प्रत्येक जण तणावग्रस्थ होत नसतो. ज्या माणसाची तणाव हाताळण्याची क्षमता मुळातच कमी असते अश्या व्यक्तीवर वरील काही गोष्टीमुळे उदभवणाऱ्या ताणतणावाची लक्षणे लगेच दिसायला सुरुवात होते.
व्यक्तीला येणारा ताण हा वाईटच असतो असे मला अजिबात वाटत नाही कारण ताण तणावात काम करायला मला स्वतःला खूप मजा येते. माझ्या सहकाऱ्यांनी व माझ्या आयुष्याशी निगडित बऱ्याच जणांनी ते अनुभवलं ही आहे व असेल. थोडा हलका तरी स्ट्रेस हा हवाच जसे कल्पना करा की परीक्षेच्या आधी किव्हा एखाद्या सामन्याच्या आधी आपल्याला ताण आलाच नाही तर?...
म्हणजेच ताण वाढला की परफॉर्मन्स ही वाढतो पण एका मर्यादेपेक्षा ताण वाढला व तो हाताळता आला नाही की परफॉर्मन्स कमी होत जातो.
So Moral Of The Story:-
शरीराचे आरोग्य कसे टिकवावे ह्या विषयी बऱ्याच जणांना माहिती आहे पण मनाचे आरोग्य हा विषय दुर्लक्षितच राहतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मनाचे आरोग्य राखू शकतो.
उदा. आपल्याला आवडणारे तसेच आधार देणारे नातेसंबंध नेहमी जोपासणे, आपल्याला ताण येणार नाही असे ध्येय व उद्दिष्ट्ये ठरवणे कारण अनेकवेळा आपण आपणच ठरवलेली ध्येय गाठण्याच्या नादात एवढा ताण वाढवतो की आपले मानसिक आरोग्य खालावते. आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याची गती कमी करणे कारण आयुष्याच्या वाढत्या गतिमानते मुळे आयुष्यातील अनेक लहान मोठया आनंदाना आपण मुकत असतो व त्यामधून सुद्धा मानसिक अस्वस्थतेचा जन्म होत असतो. तसेच इतर छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या सांगायची गरज नाही उदा. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप, आवडते छंद जोपासणे, अपल्या व्यक्तित्वामधील दोष सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे व इतर.
शरीराचा व मनाचा एक अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो आपल्यालाच समजून घेतला पाहिजे.
(हे लिहिल्या नंतर मला माझ्या वाचनात आलेल्या दोन पुस्तकांना धन्यवाद देणं आवश्यक वाटत आहे)
मनोविश्लेषण:-Sigmund Freud
प्रश्न मनाचे:- नरेंद्र दाभोलकर
धन्यवाद🙏🙏