Wednesday, July 22, 2020

"या" तारखेच्या आत लागणार दहावीचा निकाल

कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवना पासून सर्वच गोष्टी विस्कळीत झाल्या आहेत. त्याचाच परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झालेला दिसतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील बारावीचा बोर्डाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. परंतु अद्याप दहावीचा निकाल लागलेला नाही. 

       राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

      यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात घेण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. भूगोलाचा पेपर रद्द केल्या नंतर बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून भुगोल पेपरच्या गुणांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे.

No comments: