Sunday, August 23, 2020

तलासरीमध्ये आदिवासी जमिनीवरिल अतिक्रमण हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील पाटीलपाडा येथे दशरथ देवजी भुरकुड व देवजी वनश्या भुरकुड यांची मालकी कब्ज्यातील वडलोपर्जित जमीन असून त्यामध्ये ते भातशेती व गवताचे उत्पन्न घेत आहेत.मात्र या जमिनीतील गट क्रमांक ४१/अ /१० व गट क्रमांक ४१/अ /११ या दोन्ही हिस्सातील अनुक्रमे २० गुंठे व १एकर जागेवर तलासरी मधील बिगर आदिवासी लोकांनी अतिक्रमण करत पक्के बांधकाम करत इमारत बांधली आहे . या अतिक्रमण बांधकामाबाबत जमीन मालक यांनी संबधित बांधकाम हटवण्याबाबत सांगितले असता या गोष्टीकडे त्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप जमीन मालक भुरकुड यांनी केला आहे. सदर अतिक्रमण हटवाण्या बाबत भुरकुड यांनी पालघर जिल्हाधीकारी यांना १३/०७/२०२० रोजी तक्रार अर्ज करत आपल्याला न्याय मिळावा ही विनंती केली होती .त्या अर्जाची पालघर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत तलासरी तहसीलदार यांना तलासरी मधील आदिवासी जमिनी वरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे लेखी आदेश दिले आहेत .त्यामुळे आता तलासरी तहसीलदार या जमीनी वरील अतीक्रमण कधी पासून कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष आहे .

No comments: