Thursday, January 5, 2023

ग्रामपंचायत मार्फत घेण्यात येणारे कामे गाव विकास, पाणीपुरवठा मधून, आराखड्यामध्ये मांडता येतात.





1)CCT करणे व वृक्ष लागवड करणे,
2) जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे,
3) माती चे बांध तयार करून देणे
4) विहीर पुनर्भरण करणे,
5) जनावरांना पिण्याचा पाण्याचा हौद बांधकाम करून देणे,
6) सार्वजनिक शेततळे बांधणे,
7) माती आडवा पाणी जिरवा हे कार्यक्रम हाती घेणे,
8) गावातील नळांना तुट्या व वॉटर मीटर बसविणे ,
9) पिकांणा ठिबक सिंचन बसविणे,
10) शेतकऱ्यांच्या, शेतकऱ्याची परवानगी घेऊन, पडसर जागेवर वृक्ष लागवड करून देणे,
11) बोअर वर बंदी घालणे,
12) पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर/व विहीर दुरुस्ती करून देणे,


13) छतावरील पाणी संकलित करणे/शोष खड्डा करून जमिनीत मुरवणे,
14) शाळा/अंगणवाडी/ग्रामपंचायत/दवाखाना/समाज मंदिर ,इत्यादी ठिकाणी नळाने पाणीपुरवठा करून देणे,
15) सार्वजनिक शौचालय साठी नळाने पाणीपुरवठा करून देणे,
16) पाणी वापर जनजागृती कार्यक्रम राबविणे,
17) पाझर तलाव वर बांधकाम करून देणे,
18) डीप सीसीटी करणे,
19 शेतीसाठी पाणी वापर संस्था उभी करणे,
20) गावातील नाला खोलीकरण व सरळीकरण करून देणे,
21) प्रजेन्यमापक यंत्र बसविणे,
ग्रामपंचायत मार्फत गाव विकास आराखड्यामध्ये मांडता येणारे प्रश्न, यापैकी जे गावासाठी आवश्यक आहे याविषयी तुम्ही मांडू शकता, 15 वीत निधीतून, गाव विकास आराखडा मध्ये मांडू शकता, ही सर्वांनी नोंद करून घ्यावी.

No comments: