Friday, March 10, 2023

जमिनीच्या वादावर सलोखा योजनाकरीता शेतकऱ्यांना आव्हान



 सलोखा योजना
१. भाऊबंदकी मधील शेतीच्या वादावरुन असणारा दुरावा दूर होऊन सलोखा निर्माण होणार.

२. एका शेतकऱ्यांच्या नावावरील जमीन दुसऱ्याच्या ताब्यात तर दुसऱ्याच्या नावावरील जमीन पहिल्याच्या ताब्यात असेल तर केवळ एक हजार रु मुद्रांक शुल्क व एक हजार नोंदणी फी भरुन अदलाबदल दस्त होईल.

३. ताबा १२ वर्षापासून असावा.

४. तलाठी यांच्याकडे अर्ज करावा.

५. पंधरा दिवसात तलाठी, मंडळ अधिकारी पंचनामा करतील.

६. अदलाबदल करणाऱ्या दोघांची सहमती गजचेची आहे.

सलोखा योजना

मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक:-मुद्रांक - २०१२/ प्र.क्र.३६/म- ? (धोरण), दिनांक:०३ जानेवारी २०२३ अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येते आहे. सदर योजने अंतर्गत एका शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे १९ वर्षेपासून असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्राक शुल्क नाममात्र रु. १०००/- च नोदणी फी नाममात्र रु.१०००/- आकारण्याबाबत सवलत देण्यात आलेलली आहे.

सलोखा योजनेमुळे शेतकऱ्यांचे होणारे फायदे

अ.क्र.  फायदे

१.शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिन धारकांच्या जमिन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील.

२.शेतजमीनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो.

३.शेतकऱ्यांचे आपआपसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल.

४. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील.
समाजातील शेतजमिन मालकी हक्काबाबत होणारा वाद कमी करणेसाठी सलोखा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे.

                           तहसीलदार, तलासरी

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय व गावातील तलाठी / मंडळ अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

No comments: