Monday, May 15, 2023

रात्री दहापर्यंत चालेल आपला दवाखाना; पैसे न घेता तपासणी

पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ तालुक्यांत दवाखाने सुरू

राज्य  सरकारने मुंबईसह राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सातशे दवाखाने सुरू केले जाणार असून, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत आठ तालुक्यांत हे दवाखाने सुरू झालेले आहेत. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तींमागे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे.



राज्यातील ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना छोट्या-छोट्या आजारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावं लागते, त्यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतो. शिवाय प्रवासाचा खर्चही होतो. त्याच्यातच राहण्याचीसुद्धा गैरसोय होत असल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे.
 
"वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना"
  • मोफत तपासणी व मोफत उपचार

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात १ मे पासून 'आपला दवाखाना' सुरु करण्यात आला असून सकाळी ते रात्री दहापर्यंत हे दवाखाने सुरु राहणार असून, १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.


'आपला दवाखानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून औषधोपचार मिळत आहेत.- एक अधिकारी. जिल्हा परिषद

  • विनामूल्य उपचार
गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, बाह्य यंत्रणेद्वारे मोफत प्रयोगशाळा तपासणी, महिन्याच्या निश्चित दिवशी नेत्रतपासणी, मानसिक आरोग्य व समुपदेशन आवश्यकतेनुसार विशेषत संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.

  • "आपला दवाखाना पालघरमध्ये आठ 'आपला दवाखाना'
पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत.कोणत्या तालुक्यात किती?

तालुका संख्या

अ) पालघर (नवली) १

ब) डहाणू (लोणी पाडा) १

क) तलासरी (नगर पंचायत) १

ड) विक्रमगड (नगर पंचायत) १

इ) जव्हार (मांगेल वाडा) १

दुपारी दोन ते रात्री १० पर्यंत उघडा राहणार

प) मोखाडा (नगर पंचायत) १

फ) वाडा (नगर पंचायत) १

(भ) वसई (महानगरपालिका) १

पालघरमधील 'आपला दवाखाना'त दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. येथील बहुतांश नागरिक हे शेतकरी, मजूर असल्याने सकाळच्या वेळात त्यांची कामे असतात, त्यामुळे दवाखान्याचा लाभ शेतकरी, कष्टकरी वर्गाला घेता येत आहे.

 

No comments: