Sunday, May 10, 2020

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 11 वा बळी


 पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या आता 235 झाली असून वसई महानगर क्षेत्रातील एका कोरोनाबाधीत 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या आता 11 झाली आहे. ही व्यक्ती रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होती. सध्या विविध रुग्णालयांमधून 100 रुग्ण उपचार घेत असून, 124 रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 235 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–

विरार वसई महानगर क्षेत्र – 206 (त्यातील 9 मृत्यू)
वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
पालघर तालुका – 18 (त्यातील 1 मृत्यू)
डहाणू तालुका – 9

Wednesday, May 6, 2020

यंदा पावसाळ्यातील २० दिवस महत्त्वाचे!


करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे.


करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे. पाऊस लहरी असला तरी काही ठोकताळ्यांच्या आधारे पावसापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सावध राहता येते. समुद्राच्या उधाण भरतीच्या दिवशी अतिवृष्टी झाल्यास तर मुंबई परिसरात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी येत्या पावसाळ्यातील समुद्राच्या उधाण भरतीचे दिवस, वेळा आणि त्यादिवशीच्या भरतीच्या पाण्याची उंची जाहीर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच सर्वसामान्यांनाही त्याचा उपयोग होतो. यंदा जून आणि जुलै महिन्यात प्रत्येक आठ तर ऑगस्ट महिन्यात चार असे पावसाळ्यात एकूण २० दिवस समुद्राला उधाण भरती असून यादिवशी भरतीच्या पाण्याची उंची ४.५ मीटरपेक्षा अधिक असणार आहे.

दिवस वेळ पाण्याची उंची

१) गुरुवार ४ जून सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.५६ मीटर

२) शुक्रवार ५ जून सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.७५ मीटर

३) शनिवार ६ जून दुपारी १२-३३ पाण्याची उंची ४.८२ मीटर

४) रविवार ७ जून दुपारी १-१९ पाण्याची उंची ४.७८ मीटर

५) सोमवार ८ जून दुपारी २-०४ पाण्याची उंची ४.६७ मीटर

६) मंगळवार ९ जून दुपारी २-४८ पाण्याची उंची ४.५० मीटर

७) मंगळवार २३ जून दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.५२ मीटर


८) बुधवार २४ जून दुपारी २-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर

९) शनिवार ४ जुलै सकाळी ११-३८ पाण्याची उंची ४.५७ मीटर

१०) रविवार ५ जुलै दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.६३ मीटर

११) सोमवार ६ जुलै दुपारी १-०६ पाण्याची उंची ४.६२ मीटर

१२) मंगळवार ७ जुलै दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.५४ मीटर

१३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५४ मीटर

१४) बुधवार २२ जुलै दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.६३ मीटर

१५) गुरुवार २३ जुलै दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.६६ मीटर

१६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २-४५ पाण्याची उंची ४.६१ मीटर
१७) बुधवार १९ ऑगस्ट दुपारी १२-१७ पाण्याची उंची ४.६१ मीटर

१८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२-५५ पाण्याची उंची ४.७३ मीटर

१९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १-३३ पाण्याची उंची ४.७५ मीटर

२०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २-१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर


Tuesday, May 5, 2020

पालघर जिल्ह्यात लॉक डाऊनबाबत धोरण शिथील (वसई महानगर वगळून)


अखेर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या Lock Down च्या नव्या धोरणाशी सुसंगत असे नवे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी जाहीर केले आहेत. आता सोशल डिस्टन्सींग व जमावबंदीसह मास्क वापरण्याचे बंधन कायम ठेवून जिल्ह्यातील कोरोना संक्रमित क्षेत्र व वसई महापालिका क्षेत्राबाहेरील दुकाने सुरु करणे अनुज्ञेय असेल. जीवनावश्यक व अन्य दुकानांमध्ये भेदभाव होणार नसला तरी अटी व शर्तीस अधीन राहून दुकाने सुरु करता येणार आहेत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांसाठी रहदारी पूर्णपणे बंद रहाणार आहे.

Monday, May 4, 2020

नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध


नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध

    फक्त आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

    मुंबई 04 मे: कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.

    या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार

    सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

    सर्व कार्यक्रम, त्यावरील खर्च रद्द. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची तुर्तास बदली होणार नाही असेही आदेशात म्हटलं आहे.


    दरम्यान, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी  कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे.


    जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

    पालघर जिल्ह्यात 48 तासांत 3 +Ve वाढले व 12 बरे झाले


    पालघर, दि. 4 मे: पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या 48 तासांत 3 ने वाढून 176 वर पोहोचली आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 ने वाढली असून कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात पालघर जिल्हा यशस्वी होताना दिसत आहे. नवे 3 +Ve हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.


    आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 179 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–

    विरार वसई महानगर क्षेत्र – 152 (त्यातील 8 मृत्यू)
    वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
    पालघर तालुका – 16 (त्यातील 1 मृत्यू)
    डहाणू तालुका – 9

    आतापर्यंत 3302 जणांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यातील 179 +Ve व 2779 +Ve निघाले आहेत. 344 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
    179 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
    2779 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)

    • 1477 जण होम क्वारन्टाईन आहेत.
     • 212 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
     • 84 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
     • 84 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
     • 3302 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
     • 2779 नमुने निगेटिव्ह.
     • 344 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
     • 179 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 84 रुग्ण बरे झाले आणि 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

    सध्या 84 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
    ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 3
    बोळींज हॉस्पिटल – 9
    रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) – 24
    सेव्हन हिल हॉस्पिटल – 4
    टिमा (बोईसर) – 9
    अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 10
    कौल सिटी आयसोलेशन – 1
    रिलायन्स (मुंबई) – 2
    भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
    नायर हॉस्पिटल (मुंबई) – 2
    नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
    फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
    भाभा हॉस्पिटल – 1
    केईएम – 1
    सायन हॉस्पिटल – 5
    बीएमसी हॉस्पिटल गोरेगांव – 7
    हॉरीझॉन (ठाणे) – 1
    रहेजा हॉस्पिटल – 1
    पालघर ग्रामीण रुग्णालय – 1