Tuesday, June 2, 2020

पालघर जिल्ह्यात चक्रीवादळाच्या शक्यतेने 3 जून रोजी कारखाने / दुकाने बंद

 पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर 3 जून रोजी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, खाजगी कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. ह्या 1 दिवसांच्या शट डाऊनमध्ये कुठलेही सांडपाणी अथवा वायू उत्सर्जन करु नये असे आदेशात नमूद करण्यासाठी आले आहे. अत्यावश्यक सेवा व दुकाने मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज


एनडीआरएफ तुकड्याही तैनात

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हिसीद्वारे बैठक

मुंबई, दि १ : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Maha Info Corona Website

आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध  

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.   

 एनडीआरएफएसडीआरएफ तैनात  

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते. 

Monday, June 1, 2020

आता काळ स्वदेशीचा, व्हॉट्‌सऍपला नव्हे तर करा "भारत मॅसेंजर'चा वापर...

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला. अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.

example

दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्‌सऍपने जगभरात धमाल उडवून दिली. फार अल्प काळात या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्‍काचे स्थान निर्माण केले. व्हॉट्‌सऍपने केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील लोकांच्या जीवनशैलीतही मोलाचे बदल घडविले. मात्र, आता काळ स्वदेशीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ग्रुपवर चर्चा रंगते आहे ती भारतीय बनावटीच्या भारत मॅसेंजरची.

सोनम वांगचूक यांनी नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्‍स बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक युद्ध सीमेवर लढता येते असे समजू नका, तर देशातील सामान्य व्यक्‍तीलाही ते लढायचे आहे असे वांगचूक म्हणाले होते. व्हॉट्‌सऍपचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला असला तरी व्हॉट्‌सऍपच्या धर्तीवर भारत मॅसेंजरचा चाहतावर्गदेखील झपाट्याने वाढतो आहे. एका समुदायाने तर एक जूनला सर्वांनी भारत मॅसेंजर डाउनलोड करून घ्या असेदेखील आवाहन केले आहे.

पाहुणा वाराणसीत जन्माला आला

महागड्या मोबाईलमधील व्हॉट्‌सऍपची जागा घेणारा भारत मॅसेंजर नावाचा हा नवीन पाहुणा वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात सोळा ते पन्नास एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्‍सेल व अडॉबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्‌सऍप सारखीच आहे.


प्ले-स्टोअरवर उपलब्ध

भारत मॅसेंजर प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून, तो डाउनलोड करण्यासाठी अवघी 51 एमबीची जागा लागते. आत्तापर्यंत हे ऍप एक लाखाहून अधिक युझर्सने डाउनलोड केलेले असून, व्हॉट्‌सऍप ग्रुपवर हा स्वदेशी भारत मॅसेंजर प्रत्येकाने डाउनलोड करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या बाबीची माहिती

महाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या बाबीची माहिती

चीनची भारताला धमकी; आर्थिक परिणाम भोगायचे नसतील तर दूर रहा



नवी दिल्ली – चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांचे शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा भारताला होत असून अमेरिकेशी असलेले भारताचे संबंध अजूनही घट्ट होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे चीनने अमेरिका आणि आमच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धापासून भारताने दूर रहावे असा इशाराच दिला आहे. भारताला अशा प्रकारचा सल्ला देत सांगण्यात आले आहे की, अमेरिका आणि चीनमधील वादात भारत दूर राहिला तर बरे होईल, असे वृत्त चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आले आहे.

यावेळी अमेरिकेचा सहकारी होऊन भारताने जर चीनविरोधात काहाही कारवाई केली तर कोरोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील, असे चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी देत म्हटले आहे. अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धापासून भारताने दूर राहावे जेणेकरुन दोन्ही देशांमधील व्यावहारिक संबंध पुढेही सुरु राहतील, असे चीनने म्हटले आहे. भारतासोबतचे व्यावहारिक संबंध चांगले ठेवणे हे आपले लक्ष्य असल्याचेही चीनने सांगितले आहे. यामुळे यापुढेदेखील भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी चीन दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक असल्याचेही चीनने सांगितले आहे.

यावेळी भारताला इशारा देताना चीनने म्हटले आहे की, भारताला कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत यासाठी चीन प्रयत्न करत असल्यामुळे भारत-चीन संबंधांबद्दल सकारात्मक विचार करत मोदी सरकारने पुढील वाटचाल केली पाहिजे. भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर चीनने कोरोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे.