Wednesday, July 1, 2020

राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर आजपासून

मोदी सरकारच्या पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्याच्या शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाख्यात लेखी कळवावे. कर्ज न घेतलेले शेतकरी सीएससी सेंटर, बँक, एजेंट मार्फत किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वतः करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळते. हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांची मेहनतीची कमाई ही काही क्षणातच वाया जाते. शेतकऱ्याची ही समस्या विचारात घेऊन भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.

पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?

पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.

पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?

पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल 
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.

किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो.  पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.

लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?

शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.

Tuesday, June 30, 2020

भारत सरकारकडून चायनीज ए प बॅन

भारत सरकारकडून चायनीज ए प बॅन 
खालील प्रमाणे यादी आहे:-


Friday, June 26, 2020

ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना नोकऱ्या देणार ठाकरे सरकार

मुंबई – महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून यामध्ये स्थानिक तरुणांना नोकरीच्या विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या पोर्टलमध्ये सरकारी नोकऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्यांची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना राज्याचे कौशल्य विभाग मंत्री नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विभागामार्फत rojgar.mahaswayam.gov.in or www.mahaswayam.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवार आपल्या आवडीनुसार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. याद्वारे, बेरोजगार तरुणांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते, त्याचबरोबर त्यांना राज्यातील कामगार कमतरता दूर करण्यातही यश मिळू शकेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेने अशी मागणी केली आहे की राज्यातील 80 टक्के रोजगार स्थानिक तरुणांना देण्यात यावा आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे नोंदणी करावी.

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन 

जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाणेसाठी इच्छुक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोदणी करिता https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी पालघर जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

तसेच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk)तयार करण्यात आला असून . या मदत कक्षांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
तहसील कार्यालय डहाणू : 02528-221182, 
तहसील कार्यालय तलासरी : 9637692102/9637692127, 
तहसील कार्यालय पालघर : 02525-254930, 
तहसील कार्यालय वसई : 0250-2322007, 
तहसील कार्यालय वाडा : 02526-271423, 
तहसील कार्यालय विक्रमगड : 02520-240172, 
तहसील कार्यालय जव्हार : 02526-271423, 
तहसील कार्यालय मोखाडा : 02529-256826

पालघर जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत त्यांनी वर नमूद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. सदर संकेतस्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, भ्र.क्र. 9822331899 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

Wednesday, June 24, 2020

गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी


पालघर दि. 24 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत : च्या मुळगावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मणुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीने www.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
केंद्र शासनाच्या CNV Act 1959 (रिक्त पदे सक्तीने अधिसुचीत करणारा कायदा) नुसार राज्य शासकीय , निमशासकिय अस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास (एम्प्लॉयमेंट ऑफिस) आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आलेल्या कार्यालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. सबब आपल्या आस्थापनांमध्ये रिक्त असणारे व यापुढे रिक्त होणारे पदे शासनाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसुचित केल्याशिवाय भरती करू नये तसं केल्यास कायद्याचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना कायदेशीर कार्यवाहीस पात्र होणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हयामध्ये Online Virtual Job Fair चे आयोजन तात्काळ करावयाचे असल्याने आपल्या आस्थापनेमध्ये असलेल्या रिक्त पदांचा तपशिल www.mahaswayam.gov.in वेबसाईटवर नोंदविला जाईल व ज्या बेराजगरांनी नाव नोंदणी केली आहे ते त्या पदासाठी आपला पर्याय Online नोंदविता येणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्व माहिती उद्योजकांस उपलब्ध होईल त्यानुसार उद्योजक उमेदवारांची Online किंवा प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करणार आहे. तरी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या रिक्त जागा दि. २६/०६/२०२० पर्यंत नोंदणी करून या कार्यालयाच्या palgharrojgar@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावा असेहि आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.