Monday, September 13, 2021

e-Shram Card पोर्टल म्हणजे नेमके काय?, कामगारांना कसा फायदा होणार?

भारत सरकारने देशवासियांसाठी e-Shram नामक नवीन पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल एक राष्ट्रीय डेटाबेस असून ते कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत मोदी सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे . e-Shram पोर्टलचे लक्ष्य ३८,००,००० पेक्षा जास्त कामगारांना जोडण्याचे आहे. या लोकांना ई-श्रम कार्ड उपलब्ध करून दिले जातील.

असंघटित क्षेत्राला ई-श्रमचा काय फायदा मिळणार ?

असंघटित क्षेत्राचा एक मोठा डेटाबेस तयार करण्याव्यतिरिक्त, ई-श्रम मजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आणण्याचे उद्दिष्ट ठेवेल. यासह, असंघटित आणि १६-५९ वयोगटातील कोणताही कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकेल. या पोर्टलचा उद्देश सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि त्यांचे बँक खाते लिंक करणे आहे.


ई-श्रम पोर्टल: आवश्यक कागदपत्रे

नवीन ई-श्रम पोर्टल केवळ असंघटित क्षेत्रासाठी आहे ज्याद्वारे ते सरकारी लाभांचा दावा करण्यासाठी सादर केले गेले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. सर्व प्रथम, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर लागेल. जर कामगाराकडे आधार कार्ड नसेल तर तो त्याच्या जवळच्या CSC ला भेट देऊ शकतो आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करू शकतो.


ई-श्रम पोर्टल: नोंदणी कशी करावी ?

सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट eshram.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑन ई-श्रम बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यात तुम्हाला तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि तुमच्या फोनवर OTP येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची नोंदणी पूर्ण होईल. नवीन ई-श्रम पोर्टलसाठी, असंघटित कामगारांसाठी चांगले इंटरनेट कनेक्शन असणे अत्यंत महत्वाचे आहे. 

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फोनची आवश्यकता असेल. नवीन ई-श्रम पोर्टल नोंदणीकृत आणि जवळच्या सीएससीवर सेटअप केले जाऊ शकते. तसेच, कामगारांचा आधार क्रमांक CSC मध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सेटअप केला जाऊ शकतो. हे पूर्णपणे विनामूल्य असून कोणीही सरकारी फायद्यासाठी नोंदणी करू शकतो. मात्र, त्यांचे वय १६ ते ५९ दरम्यान असावे. तसेच, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्याला आयकर भरणा करण्याची गरज नाही


ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास मुदतवाढ, शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदवण्याचं शासनाचं आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्टला झाली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपच्या वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे.

ई पीक पाहणी नोंदवण्यास मुदतवाढ

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर पीक पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत करु शकतात. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली आहे.



उत्तर कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता


Tuesday, August 31, 2021

CSC व tumachimahiti.blog.com मार्फत पिक विमाचे क्लेमचे जनजागृती

सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे भाताचे नुकसान झाले असतील तर त्यांनी तलासरी तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी तलासरी व HDFC विमा प्रतिनिधी श्री गणेश घुगे संपर्क नं.9922342735 यांचेकडे पीक विमाचा क्लेम करावे. तसेच crop insurance या नावाचा app ला गुगल प्ले स्टोर यामधून डाउनलोड करून घ्या. crop insurance या नावाचा app चे खालील youtube लिंक पाहावी. पिक विमाचे क्लेमविषयी youtube link वर उपलब्ध आहे

Friday, June 18, 2021

पालघर जिल्हा पुन्हा लेव्हल 3 मध्ये; 21 जूनपासुन निर्बंध वाढणार


जिल्ह्याचा मागील आठवडाभरातील करोना पॉझिटिव्ही दर 5 पेक्षा अधिक (5.18) व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 18.24 टक्के झाल्याने जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आहे. त्यामुळे आता निर्बंधात पुन्हा वाढ होणार असुन सोमवार, 21 जूनपासुन पूर्वीचेच निर्बंध लागू होणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज, शुक्रवारी याबाबतचे नवीन आदेश जारी केले आहेत.

काय होते पुर्वीचे नियम :

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापने सोमवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार व रविवार बंद राहतील.
  • मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 4 वाजेनंतर पार्सल, टेक अवे (घेवून जाणे) व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल.
  • खाजगी आस्थापना व कार्यालये कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 
    8) बाह्य मैदानी खेळ सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
  • विवाह समारंभास केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल.
  • अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल.
  • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी राहील. तर 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
  • वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) हॉलच्या 50 टक्के उपस्थिती राहिल.
  • बांधकाम केवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहणार्‍या मजुरांवर सुरु राहिल. किंवा कामगारांना संध्याकाळी 4 वाजता सोडणे बंधकारक राहिल.
  • कृषी संबंधित दुकाने सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के आसन क्षमतेने सुरु राहिल. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही.
  • जिम, सलुन ब्यटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच एसीचा वापर करता येणार नाही.
  • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.
  • अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सायंकाळी 05.00 वाजेनंतर मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.

दरम्यान, मागील आठवड्यात जाहीर झालेल्या आकडवारीनुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 27.66 टक्के असल्याने जिल्ह्याचा लेव्हल 3 मधुन लेव्हल 2 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे 14 जूनपासुन अनेक निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले होते. विशेष म्हणजे सर्वच दुकानांना नियमितपणे दुकाने सुरु ठेवण्याची सवलत मिळाली होती.