Thursday, March 9, 2023

दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश अर्ज

दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने  दिलेल्या सुचना विचारात घेऊन सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालयाचे  पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि. ०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते दि. १७/०३/२०२३ रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपण आरटीई २५ टक्के प्रक्रियेंतर्गत पालकांना अर्ज भरण्याबाबतच्या सुचना व्यापक स्वरुपात प्रसिद्धीस देण्यात यावी. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईल अर्ज भरणे, प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रे आणि इतर
अनुषंगिक बाबींबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत. १. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सुचना:-

1. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी)

नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानीत व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ. १ ली किंवा पुर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पुर्ण करावी.

॥. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.


वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरीता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. III. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपुर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी. V. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेवून पालकांनी बलूनद्वारे निवास स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरीता तो बलून जास्तीत जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

IV.

VI. प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपुर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणींमुळे परिपुर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब, शक्य तितक्या लवकर परिपूर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
VII. प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्याचे निराकरण करण्यात यावे. पालकांनी ऑनलाईनन अर्ज करतांना अचुक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म VIII.

दिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, इतर).

X ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.

X. यापुर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरुन पुन्हा

प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच
परिपूर्ण अर्ज सादर करावा, एका पेक्षा अधीकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज

लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
XI. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत. २. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश

प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

I. निवासी पुरावा :- २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतः च्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास निवासी पुराव्याकरीता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

॥. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राह्य धरण्यात येईल. सदरचा भाडेकरारहा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणाचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक / पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल.
III. जन्मतारखेचा पुरावा :- ग्रामपंचायत / मनपा/नपा यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला/ आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल.

IV. सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडीलांचे/बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे :- तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा (वडिलांचा/बालकांचा) जातीचा दाखला. परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरीता ग्राह्य धरण्यात येणार नाही.

V. आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातुन प्रवेशाकरीता वार्षिक उत्पन्नाचा दाखला : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष २०२०-२१ किंवा २०२१-२२ या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला. उत्पन्नाच्या दाखल्याकरीता पगाराचा दाखला (Salary slip), कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

VI. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा :- जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक (Single Parent) (विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तिचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

VIII.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधारकार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरीता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही, तर अशा प्रकरणांमध्ये बालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत बालकाचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकाच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पूर्तता न झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.
X. अनाथ बालके ( वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे :- अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/ बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. क) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.

X.

कोव्हीड प्रभावित बालक (ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरीता कागदपत्रे:-

अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र.

ब) कोव्हीड १९ मुळे मृत्यु झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, (Medical Certification of Cause of Death (Form No.4 or 4a), (See Rule 7). क) सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणन हे शासकीय / पालिका/ महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम. आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय /
प्रयोगशाळा यांचा अहवाल.

XI एच. आय. व्ही बाधित/प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे:- जिल्हा

शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.

XII. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे :- १. न्यायालयाचा निर्णय, २. घटस्फोटित महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

XIII.

न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला :- १. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा

पुरावा, २. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

XIV.

विधवा महिला :- १. पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, २. विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

३. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत (Lottery) काढण्याकरीता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पद्धतीने सोडत (Lottery) काढण्यात येईल. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसी द्वारे पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्याथ्र्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने आरटीई प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एनआयसी कडून मेसेज पाठविले जातील.
४. सोडत लॉटरी झाल्यांनतर पडताळणी समितीला आर.टी.ई. पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटर वर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.

५. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आलेले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरीता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.

६. कागदपत्रे तपासणी करण्याकरीता गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे.


७. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी

करावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरीता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क

केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approach अशी नोंद करावी. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
८. पडताळणी समितीने बालकाच्या प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर भरावी. ९. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे, पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता आणि बालकाचे वय याची पडताळणी करावी. १०. समितीने बालकाचे कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर बालकांना प्रवेश देण्याची सुविधा

आर.टी.ई. पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पडताळणी समितीने कागदपत्र तपासणीअंती पात्र केलेल्या बालकांचे पालक गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी. अशा रद झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./ म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.
११. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. १२. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन

करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

१३. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला

प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही

पालकाच्या अर्जाची किया निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. १४. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी.

Monday, March 6, 2023

पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी पिकांना फटका

पालघर विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी पिकांना फटका


 पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असताना पालघर, नाशिक तसेच बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली पालघर जिल्ह्यात जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजेच्या कडकडाट सहकारी पाऊस कोसळला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पालघर मध्ये विजांचा कळकाशा पाऊस जिल्ह्याच्या बहुतांशी भागातल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली.
 वाडा, विक्रमगड,जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटसह पाऊस बरसला. यामुळे सर्वसामान्य शेतकरी,बागायतदारास,वीट भट्टी,व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंचेचे वातावरण पसरले आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज दरम्यान महाराष्ट्रातील दिवस महाराष्ट्र अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. 

फळबागा पिकांना फटका 

राज्यात सातत्याने तापमाना चढ-उतार होत आहेत कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे या हवन याचा परिणाम रब्बी हंगामाचे पिकावर रब्बी क्रोप होत आहे पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

Sunday, March 5, 2023

तुमच्या हिस्साच्या तुम्हालाच रेशन आणि रेशन दुकानदारांना मिळणार फोर जी मशीन

पूर्वी रेशन लाभार्थ्यांना रेशन घेतल्यानंतर पावती दिली जात होती. आता ऑनलाइनचा जमाना असून मशीनद्वारे धान्य मिळाल्याची पावती दिली जात आहे. काही भागात मोबाइल नेटवर्कच्या समस्या असल्याने रेशन दुकानदारांकडे असलेल्या जुन्या ई- पॉस मशीन चालत नाहीत. ही समस्या निकाली काढण्यासाठी ज्या भागात ज्या मोबाइल कंपनीचे फोर जी नेटवर्क आहे त्याची माहिती घेतली जात आहेत. ज्या भागात ज्या मोबाइलचे नेटवर्क आहे त्या कंपनीचे कार्ड टाकून नवीन फोर जी मशीन रेशन दुकानदारांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठीची तयारी केली जात आहे.
रेशन दुकानदारांना मिळणार फोर जी मशीन

रेशनवरील धान्य वितरणात ई- पॉस मशीन ही महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे अंगठे अर्थात थम्ब घ्यावे लागतात. ग्रामीण भागात रेंजची अडचण असल्याने धान्य वितरण करताना थम्ब घेण्यास विलंब लागत होता. एका शिधापत्रिकाधारकास जवळपास १५ मिनिटे कालावधी लागत असे. त्यामुळे टूजी ई-पॉसमधील तांत्रिक त्रुटीमुळे अडचणीचे ठरू लागले होते. मागील दोन वर्षापासून रेशन दुकानदार संघटना नवीन व अद्यावत मशीनची मागणी करत होती. त्यामुळे राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर फोर जी ई-पॉस मशीन रेशन दुकानदारांना देतील, त्यानंतर सरसकट सर्वांनाच या फोर जी मशीन दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रेशन वितरणात येणार पारदर्शकता

ग्रामीण भागात एका मोबाइल कंपनीचे नेटवर्क अधिक असते तर इतर कंपन्यांचे नेटवर्क येत नसते. पूर्वी टू जी मशीनमध्ये एकाच कंपनीचे सीमकार्ड टाकून सर्व मशीन वितरित करण्यात आल्या होत्या. अनेक गावांमध्ये त्या नसल्याने धान्य वाटप करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे ज्या गावांमध्ये ज्या कंपनीच्या मोबाइलची रेंज आहे. त्याची माहिती रेशन दुकानदारांकडून घेतली जात आहे. ज्या ११३ मोबाइलची रेंज गावात आहेत त्याच कंपनीचे सीमकार्ड मशीनमध्ये बसवून २१२ दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे रेशन वितरणात पारदर्शकता येणार आहे.


टू जी ई-पॉस मशिनमधून धान्य वितरण करताना तांत्रिक अडथळे येत असल्याने रेशन दुकानदारांना अद्यावत असलेल्या फोर जी ई-पॉस मशीन देण्याचा निर्णय राज्यस्तरावरून घेण्यात आला आहे.

नव्या फोर जी मशीन सोबत थम्ब व डोळ्याचे स्कॅनर ही सुविधाही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या बोटांच्या रेषा मिटल्या असतील त्यांच्या डोळ्याचे स्कॅन करून त्यांना धान्य दिले जाणार आहे. येणार नाहीत.

त्यामुळे वितरण यापुढे लाभार्थ्यांना धान्य करताना अडचणी मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन करून दिल्या जाणार आहेत. रेशन मशीनमुळे लाभधारकांनाही दुकानदारांना या नव्या मशीन उपलब्ध देण्यास सुलभता येणार आहे..

Saturday, March 4, 2023

सरळ सेवेने भरतीसाठी दोन वर्षाची शिथिलता



शासन सेवेत सरळ सेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादित 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या  जाहिराती तील दोन वर्षाचे शिथीतलता  देण्यात येणार आहे मुख्यमंत्री यांच्या  पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवेदन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री यांनी विधानसभेत व मंत्री यांना यांनी विधानपरिषद केला यांनी न्यामुळे सरळ सेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट अ ब क ड (वर्ग एक-चार) या पदाच्या उमेदवारांना मोठा दिलसा मिळणार आहे.
 देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महा उत्सवी वर्षाच्या औचित्याने शासनाने 75000 पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे ही भरती प्रक्रिया राबवीत असताना लोक प्रतिनिधीकडून ही अनेक निवेदन प्राप्त झाली आहे या नियोजनाचा विचार करून आणि कोरोना विषाणू संकट असे कारणांमुळे ज्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेली आहे असे उमेददारांना परीक्षेत बसण्याची संधी प्राप्त करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2023 नियुक्त देण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ची दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. कमाल वयोमर्यदेत दोन वर्षांनी शिथिलता केली म्हणजेच जर खुल्या वर्गासाठी विहित केलेले कमाल वयोमर्यादाचा 38 वर्ष असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे असेल तर 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल यामुळे ज्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेली आहे सर्व उमेदवारांना दिलसा मिळणार आहे.

Friday, March 3, 2023

महाडीबीटीवर मोफत सोलर पंप योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणलेली आहे म्हणजेच महाडीबीटीवर अनुसूचित जमातीचे शेतकरी साठी मोफत सोलर पंप योजना करिता आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही योजना सोलर पंप योजना अनुसूचित जमातीसाठी शंभर टक्के अनुदान आहे.
अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासीचे शेतकरी यांनी महाडीबीटी या साइटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अनुसूचित जमाती चे विशेष शेतकरी योजना चे आपल्याला सोलर पंप याचे निवड करून रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर त्या नोंदणीचे 23 रुपये किंवा 25 रुपये जी रक्कम आहे ती रक्कम भरावी ची ऑनलाईन किंवा नेट बँकिंग किंवा क्यू आर स्कॅन याच्या मार्फत पैसे भरायचे आहेत तसेच ते झाल्यावर महाडीबीटीवर लॉटरी लागल्यानंतर आपली या योजनेची निवड करण्यात येईल.
सोलर पंप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1.सातबारा उतारा
2.आठ A उतारा 
3.जातीचा दाखला 
4.उत्पन्नाचा दाखला
5. आधार कार्ड
6. मोबाईल न