कोरोना (कोव्हीड-१९) विषाणुचा संसर्ग व वाढत्या प्रादुर्भावा बाबत पालघर जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले असल्यामुळे बियाणे व खते विक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. परंतु खते व बियाणे जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मध्ये समाविष्ट असल्याने व शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरु ठेवावीत असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
राज्यात येत्या खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे इतर राज्यात निर्मिती होऊन प्रक्रिया व विक्रीसाठी महाराष्ट्र
राज्यात येत असते. राज्यातील सर्व बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगिक बियाणे पॅकिंग, हाताळणी, केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, राज्यांतर्गत व परराज्यातून बियाणाची वाहतूक आणि राज्यातील बियाणे विक्री केंद्र सरु ठेवणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांची सुध्दा आवश्यकता असल्याने किटकनाशकांची आयात, परराज्यातून वाहतूक व राज्यांतर्गत विक्री सुरु ठेवणे आणि शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होणेबाबत आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी कळविले असून त्यानुसार पालघर जिल्ह्यातील सुरळीत पुरवठा होण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी हे आवाहन केले आहे.
Saturday, April 11, 2020
बियाणे व खते विक्रेत्यांनी दुकाने सुरु ठेवावीत!- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment