मुंबई : वाढती बेरोजगारी हे आव्हान बनले असताना सरकारने तरुणांना वाऱ्यावर सोडले असल्याचे म्हणत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) ने राज्यव्यापी बेरोजगार नोंदणी अभियान सुरू केल्याची माहिती 'डीवायएफआय'च्या राज्य महासचिव प्रिती शेखर यांनी महाराष्ट्र जनभूमी बोलताना सांगितले.
कोरोना साथीच्या आजारापूर्वीही बेरोजगारी साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत होती. आता तर बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही तरुणांना वार्यावर सोडले आहे, असल्याचे डीवायएफआय ने म्हटले आहे.
सरकारने सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्रातील नोकरी भरती करावी, सर्व क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर कराव्यात, ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरी रोजगार हमी योजना सुरू करावी, सर्व बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेकारी भत्ता म्हणून रुपये ५,००० मिळावेत, या मागण्या डीवायएफआयने केल्या आहेत
बेरोजगार आणि कंट्राटी नोकरीतील सर्व तरुणांना खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करण्याचे आवहान केले आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScslkQnxxnIi27yLchtEfmsV_gw-EKMlR3k-G8biWZ0OyL8Gg/viewform
No comments:
Post a Comment