प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार सुविधा.
पोस्ट कार्यालयातच उघडा बँक खाते
या योजनेच्या लाभासाठी खाती उघडण्याची मोहीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे असे आव्हान कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण व विकास पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकार तर्फे फक्त प्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्ष लाभ देण्यात येतो. या योजनेच्या तेराव्या हप्त्यांचा लाभ करण्याची कारवाई सध्या सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करायचे बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधकारक आहे. राज्य सद्यस्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांची बँक खाते त्यांच्या आधार क्रमांक जोडलेली नाहीत. बँक खाते आधार क्रमांकाची संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्टमास्टर यांच्या मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत खाते उघडावे.
गावनिहाय याद्या उपलब्ध:-
१)ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागद पत्राशिवाय करता येणार असल्याने सोपी व सुलभ आहे.
२) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बॅंक खाती आयपीपीमध्ये उघडून ती आधार क्रमांकाची जोडण्यासाठी राज्याच्या आय पी पी बी कार्यालयास गावनिहाय याद उपलब्ध करून दिले आहेत.
३) गावातील पोस्टमास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आय पी पी बी मध्ये बँक खाते सुरू करतील.
No comments:
Post a Comment