दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळाचा धोका ज्या गावांना होण्याची शक्यता आहे अश्या गावातील लोकांसाठी निवारा छावण्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियंत्रण कशाची स्थापना करण्यात आली आहे. NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या असुन, निसर्ग चक्रीवादळाशी सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दिनांक 01 ते 04 जुन 2020 या कालावधीत पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
दिनांक 03 जुन 2020 रोजी आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचीवरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.
घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे.
सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे ठेवावे. आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.
मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी पुढे नमुद केलेल्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पालघर – 02525297474,
वसई विरार महानगरपालिका – 02502529885,
पालघर तहसिल नियंत्रण कक्ष – 02525254930,
डहाणू तहसिल नियंत्रण कक्ष-02528-221182,
तलासरी तहसिल नियंत्रण कक्ष – 02521220018 / 9637692102/ 9637692127,
वसई तहसिल नियंत्रण कक्ष – 02502322007,
मोखाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 2520222426 /7769901260,
विक्रमगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02520240925,
जव्हार तहसिल नियंत्रण कक्ष – 02520222426 / 77769901260,
वाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 02526271431
नागरिकांच्या मदतीसाठी NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये नियुक्तकरण्यात आल्या असुन, नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment