Showing posts with label Healthy Human. Show all posts
Showing posts with label Healthy Human. Show all posts

Sunday, April 2, 2023

नागरिकांच्या खिशावर पडणार बऱ्यापैकी ताण

काही क्षेत्रांमध्ये नव्या नियमांची अंमलबजावणी


काही क्षेत्रांमध्ये नव्या नियमांची अंमलबजावणी; तर काही क्षेत्रांमध्ये वारस नोंदवणे होणार अनिवार्य


एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होऊ घातले आहेत. अत्यावश्यक औषधे महागणार आहेत. वीज दरवाढ होऊ घातली आहे. चारचाकी गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर ६ टक्के शुल्क आकारले होते. १ एप्रिलपासून हे शुल्क मागे घेतले जाणार आहे.अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा.



वैद्यकीय क्षेत्र


1) वैद्यकीय क्षेत्र:-

तब्बल ९०० औषधांच्या किमती किमान १२ टक्क्यांनी वाढणार आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. या औषधांमध्ये अत्यावश्यक तसेच हृदयविकारावरील औषधांचा समावेश आहे.


कर मंडळ

2) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ:-

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत तुम्ही दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास, पॅन निष्क्रिय केले जाणार आहे. त्याचबरोबर या काळात आधार आणि पॅन जोडण्यासाठी १ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.


✅ आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचे लिंक करण्यास अधिक सविस्तर खालील क्लिक करा

✔️ शेवटची तारीख वाढवली पॅन- आधार लिंक करण्याची


✔️ आधर पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ 30जून पर्यंत


ऑटोमोबाईल इंडस्ट्रीझ



3) ऑटोमोबाईल इंडस्ट्रीझ:-

भारत स्टेज-२ च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज- बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी अशा अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढतील.





 सोन्याचा इंडस्ट्रीझ




4) सोन्याचा इंडस्ट्रीझ:-

१ एप्रिल २०२३ पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ एप्रिलपासून, ज्वेलर्स ६ अंकी HUID क्रमांक नोंदणीकृत असलेल्या सोन्याची विक्री करू शकणार आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने हा निर्णय घेतला आहे.



5) वीमा योजना:-

 २०२३ च्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार १ एप्रिल २०२३ पासून वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. यातून युलिप योजनेला वगळण्यात आले आहे.




6) डिमॅट खातेधारक:-

डिमॅट खातेधारकांनी १ एप्रिल २०२३ पूर्वी नॉमिनीचे नामांकन करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खातेधारकांचे खाते गोठवले जाणार आहे. सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. नॉमिनीची प्रक्रिया कशी करावी याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.




7)म्युच्युअल फंड :-

 सेबीने सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ३१ मार्चपूर्वी त्यांचे नॉमिनी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास, १ एप्रिल २०२३ पासून, पोर्टफोलिओ गोठवला जाईल. तपशील सबमिट केल्यानंतरच ते सुरू होईल.




दिव्यांग


8) दिव्यांग:-

दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिलपासून युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे यूडीआयडी नाही, त्यांना त्यांच्या यूडीआयडी नोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

खालीलप्रमाणे इतर योजना क्लिक करा👇👇👇👇


✔️ संजय गांधी अनुदान निराधार योजना


✔️  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना


✔️ राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य लाभ योजना

Friday, June 19, 2020

मन, स्वभाव व ताणतणाव

लेख थोडा मोठा असला तरी अवश्य पूर्ण वाचा.

मन

मानवी मनाचे तीन भाग असतात
◆व्यक्त मन (Conscious Mind):- मनाच्या या भागातील विचार व भावना आपल्याला सहजी अनुभवता येतात.
◆अव्यक्त मन (Unconscious Mind):-मनाच्या या भागामधील विचार व भावना आपल्याला सहजासहजी अनुभवता येत नाहीत. अनेक प्रकारच्या मानसिक अस्वस्थता याच भागातून निर्माण होतात.
◆अर्धव्यक्त मन (Subconscious Mind):- काँशियस माइंड व अंकाँशियस माइंड या मधील ब्रिज म्हणजे सबकाँशियस माइंड. या भागामध्ये दोन्ही भागांच्या विचार व भावनांचे मिक्सर चालू असते.
मानवी मनाच्या स्वास्थ्यासाठी या तिन्ही भागांचा समतोल राखणे अतिशय महत्वाचे असते. यामधील कुठलाही असमतोल मानसिक अस्वस्थता निर्माण करतो.

स्वभाव

प्रत्येक व्यक्तीची स्वतःला व आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना हाताळण्याची विशिष्ट अशी पद्धत असते, या पद्धतीला त्या व्यक्तीचा स्वभाव असे म्हंटले जाते.
स्वभावाचे दोन भाग असतात.
◆Temperament :- नैसर्गिक रित्या आनुवंशिक भेटलेला भाग म्हणजेच टेम्परामेन्ट
◆Character:- व्यक्तीला त्याच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांमधून घडणारा भाग म्हणजेच कॅरॅक्टर
जसे लहान बाळाचे टेम्परामेन्ट आपल्याला लगेच समजते उदा. काही बाळ लहान पणापासून शांत असतात तर काही चंचल तर काही अस्वस्थ व चिडचिडी असतात.
लहानपणापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आपल्याला वेगवेगळे असे अनेक अनुभव येत असतात. या अनुभवामधून आपल्या कॅरॅक्टर मद्धे वेळोवेळी अनेक बदल घडून येत असतात.
व्यक्तीची स्वप्रतिमा, ताणतणाव हाताळण्याची पद्धत, विविध अनुभवांना सामोरे जाण्याची पद्धत, इतर लोकांशी वागण्याची पद्धत अशा सर्व गोष्टींवरून व्यक्तीचा स्वभाव ठरत असतो.
आदर्श स्वभाव वास्तवात असणे अशक्य आहे असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात दोष हा असतोच.

ताणतणाव

ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. स्ट्रेस म्हणजे प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कमी पडते , तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ताणतणाव असे म्हणतात.
सध्या बहुतेक लोकांचे आयुष्य हे गतिमान झाले आहे व स्पर्धा ही खूप वाढली आहे. या दोन्ही गोष्टींचा स्वाभाविकच परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला होऊन ताणतणाव वाढत आहेत. तसेच कौटुंबिक ताणतणाव, भौतिक सुखाच्या मागे लागणाऱ्या सध्याच्या संस्कृतीमुळे उदभवणारे ताणतणाव व इ. अश्या अनेक प्रकारच्या ताणतणावांना बऱ्याच लोकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार स्ट्रेस हाताळण्याची क्षमता ही भिन्न भिन्न असते त्यामुळे प्रत्येक जण तणावग्रस्थ होत नसतो. ज्या माणसाची तणाव हाताळण्याची क्षमता मुळातच कमी असते अश्या व्यक्तीवर वरील काही गोष्टीमुळे उदभवणाऱ्या ताणतणावाची लक्षणे लगेच दिसायला सुरुवात होते.
व्यक्तीला येणारा ताण हा वाईटच असतो असे मला अजिबात वाटत नाही कारण ताण तणावात काम करायला मला स्वतःला खूप मजा येते. माझ्या सहकाऱ्यांनी व माझ्या आयुष्याशी निगडित बऱ्याच जणांनी ते अनुभवलं ही आहे व असेल. थोडा हलका तरी स्ट्रेस हा हवाच जसे कल्पना करा की परीक्षेच्या आधी किव्हा एखाद्या सामन्याच्या आधी आपल्याला ताण आलाच नाही तर?...
म्हणजेच ताण वाढला की परफॉर्मन्स ही वाढतो पण एका मर्यादेपेक्षा ताण वाढला व तो हाताळता आला नाही की परफॉर्मन्स कमी होत जातो.

So Moral Of The Story:-
शरीराचे आरोग्य कसे टिकवावे ह्या विषयी बऱ्याच जणांना माहिती आहे पण मनाचे आरोग्य हा विषय दुर्लक्षितच राहतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मनाचे आरोग्य राखू शकतो.
उदा. आपल्याला आवडणारे तसेच आधार देणारे नातेसंबंध नेहमी जोपासणे, आपल्याला ताण येणार नाही असे ध्येय व उद्दिष्ट्ये ठरवणे कारण अनेकवेळा आपण आपणच ठरवलेली ध्येय गाठण्याच्या नादात एवढा ताण वाढवतो की आपले मानसिक आरोग्य खालावते. आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याची गती कमी करणे कारण आयुष्याच्या वाढत्या गतिमानते मुळे आयुष्यातील अनेक लहान मोठया आनंदाना आपण मुकत असतो व त्यामधून सुद्धा मानसिक अस्वस्थतेचा जन्म होत असतो. तसेच इतर छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या सांगायची गरज नाही उदा. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप, आवडते छंद जोपासणे, अपल्या व्यक्तित्वामधील दोष सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे व इतर.
शरीराचा व मनाचा एक अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो आपल्यालाच समजून घेतला पाहिजे.
(हे लिहिल्या नंतर मला माझ्या वाचनात आलेल्या दोन पुस्तकांना धन्यवाद देणं आवश्यक वाटत आहे)
मनोविश्लेषण:-Sigmund Freud
प्रश्न मनाचे:- नरेंद्र दाभोलकर
धन्यवाद🙏🙏

Wednesday, June 17, 2020

कुपोषित बालके, गरोदर माता यांना उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि 17 : जिल्ह्यातील कुपोषित बालके तसेच गरोदर माता यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
पहिल्या टप्यात अमृत आहार योजनेच्या लाभार्थीची प्रकल्प निहाय मागणी जनरेट करण्यात आली असून. दुसऱ्या टप्प्या तील निधी जलद गतीने वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. सध्यास्थितीत तालुका निहाय निधी वितरीत झाला आहे. शासन निर्णयानुसार सन 2020-21 मधील अर्थसंकल्पीय निधीच्या 33% निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले. 
 कुपोषण निर्मुलन अंतर्गत टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधकारी कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा परषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेन्द्र वारभुवन, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, श्री. नायर, उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, स्वप्नील तागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
बाल उपचार केंद्र (CTC) वाढविण्याची वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
या केंद्र मध्ये आवश्यतेप्रमाणे बालकांना दाखल करण्यात येणार आहे. पावसाळ्यात सर्व्हेमध्ये आढळुन आलेल्या आजारी सॅम बालकांना सीटीसी मध्ये उपचार करण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
आदिवासी भागातील कुपोषित बालके, गरोदर माता यांना पोषक आहार देण्याबाबत अंगणवाडी सेवीकांना आधुनिक पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून, पालघर, वसई, डहाणु, तलासरी तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी संहिता संस्था, ग्राममंगल संस्था यांचा सामंजस्य करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित करण्यात येत आहे.
वाडा तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित  करण्यात येत आहे.
विक्रमगड व जव्हार तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांच्याशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
कोसबाड येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण देणारे शासकीय प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच येथे ग्रामसेवकांना देखील प्रशिक्षण दिले जाते.
कुपोषित बालकांचे वजन करण्याबाबतची कार्यवाही सुरु असून अंगणवाडीतील बालकांचेहि वजन उंची पालकांच्या समक्ष घेण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.