Showing posts with label Banking Sector. Show all posts
Showing posts with label Banking Sector. Show all posts

Wednesday, May 24, 2023

होम लोन घेताना कोणत्या विषयी माहिती लक्षात ठेवावे!



home loan

मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात. कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
कोणते कारण ? 
घर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज
पात्रता कशी ठरते?
होम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.
■ चांगल्या सिबिल स्कोअरमुळे मंजुरींची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असेल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परतफेडीची क्षमता तपासली जाते.

किती कर्ज मिळते?
तुमच्या मासिक पगाराच्या ५० टक्के रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी भरता येईल, अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी होम लोनची रक्कम वाढेल.
कोणती कागदपत्रे ?
आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / चालक परवाना, नियोक्ता ओळखपत्र, सैलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो में १६ किंवा आयकर रिटर्नसह ६ महिन्यांचे जुने बैंक स्टेटमेंट व्याजदर कसे निवडावेत?

फिक्स्ड रेट
ठरलेल्या व्याजदरानेच गृहकर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत असे भरावे लागतात.

फ्लोटिंग रेट
यात दर बाजारातील व्याजदरातील चढउतारानुसार बदलतात, व्याजदर वाढतो तेव्हा असेही वाढतात. कमी असेल, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी होते.

घराच्या एकूण किमतीच्या ८० ते ९० टक्के रक्कम होमलोन म्हणून मिळते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांचाही समावेश असतो.

Monday, March 20, 2023

मृत्युपत्र नेमक काय असते?


        मृत्युपत्र कोण करू शकते?


कोणतीही सज्ञान व्यक्ती जिचे वय २१ वर्षे पूर्ण आहे व त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे. अशी व्यक्ती मृत्युपत्र करून ठेवू शकते. तसेच मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीने कोणाच्याही दबावाखाली न येता स्वेच्छेने मृत्युपत्र केलेले असावे.

भारतीय वारसा कायदाच्या कलम २ मध्ये इच्छापत्र/ मृत्युपत्राची व्याख्या केलेली आहे.
मृत्युपत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालकीची संपत्ती कोणाला हस्तांतरित करायचे हे ठरवते किंवा तशी इच्छापत्राद्वारे म्हणजेच मृत्युपत्राद्वारे लिखित स्वरूपात इच्छा व्यक्त करते.

मृत्युपत्र करणार त्याच्या नावावर असलेल्याच संपत्तीचा मृत्युपत्रामध्ये उल्लेख करू शकतो. जर संपत्ती संयुक्त स्वरूपात असेल तर त्याच्या हिश्यापुरतेच मृत्युपत्र करता येईल.
मृत्युपत्र मध्ये समावेश करता येणाऱ्या मिळकती किंवा संपत्ती-

१. वैयक्तिक किंवा संयुक्त मालकीची मालमत्ता (जी      सहसा हयात असलेल्या मालकाकडेच जाते. जसे की, पती, पत्नी, मूल किंवा भावंड.)
२. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा पेन्शन बेनिफिट्स यासारख्या ट्रस्टमध्ये ठेवलेल्या मालमत्ता.
३. अचल संपत्ती जसे की कार, सोने-चांदी व इतर भौतिक वस्तू.

४.बाँड, शेअर्स, बँक खाते इत्यादी
५. रॉयल्टी
६. कर्ज फेडण्याचे दायित्व तसेच इतर जबाबदारी

- मृत्युपत्र कोणाच्या नावे करत आहे त्या लाभार्थीचे स्पष्ट नाव, पत्ता व त्या व्यक्ती विषयी सविस्तर माहिती स्पष्टपणे नमूद केलेली असली पाहिजे.
- जर लाभार्थी जास्त असतील तर प्रत्येकाचा हिस्सा नेमकेपणाने नमूद केलेला असला पाहिजे.
- मृत्युपत्रासाठी दोन Executor नेमणे आवश्यक असते.
- तसेच दोन साक्षीदार त्यांच्या नाव व पत्त्यासहित असणे आवश्यक आहे. मृत्युपत्रावर साक्षीदारांच्या सह्या अनिवार्य असतात.
- मृत्युपत्र हे लिहून किंवा टाईप केलेले असले तरी चालते. परंतु, मृत्युपत्र हे स्टॅम्प पेपर वर करणे गरजेचे नसते. तसेच ते स्पष्ट व समजेल अशा भाषेत असावे.   -मृत्युपत्रांमध्ये तारीख, वार इत्यादीचा उल्लेख असावा व मृत्युपत्र करणार याची सही असणे अत्यावश्यक असते.
-एखाद्या व्यक्तीने जर एकापेक्षा जास्त मृत्युपत्र केले असतील तर शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरण्यात येते.
-मृत्युपत्र केल्यानंतर त्यात काही बदल किंवा सुधारणा करता येतात त्यास कायद्याच्या भाषेत codicil असे म्हणतात.
-एखादी व्यक्ती त्याच्या हयातीत कधीही मृत्युपत्र रद्द करू शकते किंवा त्यात बदल करू शकते किंवा त्यात अधिक माहिती समाविष्ट करू शकते.
मृत्युपत्राची नोंदणी ही ऐच्छिक आहे परंतु मृत्युपत्र नोंदणी करणे अनेकदा फायद्याचे ठरते आणि नोंदणीमुळे तारखांचे वाद उद्भवत नाहीत. ही नोंदणी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी दुय्यम निबंध कार्यालयात करता येते.




Friday, July 17, 2020

मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये ‘या’ बँकांनी केले मोठे बदल


मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत देशातील काही प्रमुख बँकांनी मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा या बँकांनी केली आहे. बँकेने हे नियम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बदलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे.


किमान 2 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात ठेवणे आवश्यक आहे, ज्याची मर्यादा याआधी 1,500 रुपये होती. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.

100 रुपयांपर्यंत शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेत कमी लोक यावेत, यासाठी सध्या हे सर्व बँक करीत आहे. त्याचबरोबर बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

तसेच अ‍ॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. पूर्वी कोणतेही शुल्क ECS व्यवहारांवर आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग शुल्क आकारणार आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.