Friday, August 26, 2022
शासकीय योजना (प्रकल्प)
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना
Monday, August 22, 2022
PM-KISAN Ekyc last date
Tuesday, August 16, 2022
ग्रामपंचायत- पंचायत समिती योजना- रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज सुरू
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती ), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्र
7/12 व 8 अ, आधारकार्ड, बँक पासबुक व जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे.
मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत.
अनुदान - व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट, नाडेप कंपोष्ट - रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट,
शेततळे -आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत
योजनेत अंतर्भुत फळपिके / वृक्ष - आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडूलींब, शेवगा, केळी, ड्रॅगनफ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु, रबर, महारुख, मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी.
फुलपिके - गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा
अनुदानातील अंतर्भुत बाबी -जमीन तयार करणे, खड्डे तयार करणे, कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे, खते देणे, आंतरमशागत, पीक संरक्षण व पाणी देणे इ.
अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Wednesday, August 10, 2022
Tuesday, August 9, 2022
जागतिक आदिवासी दिननिमित्त सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा
जागतिक आदिवासी दिननिमित्त सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा...
युट्युब चेनला वरील लोकप्रसिद्ध गाणे खालीलप्रमाणे:
१.जय जोहार जय आदिवासी
2. आला सह्याद्रीचा वाघ
१०.Hamu Aadivasi Bhaya new Song 9 August Aadivasi Divas
१४.Adivasi Nari |आदिवासी नारी | 9 August Aadiwasi Divas Song
१८. 9 August Adivasi Song |Jangal Na King Adivasioni Teem
१९.Jungle Na King | જંગલના કિંગ | Dj Timli | Adivasi New Song 2022 | 9 August |
२०.🏹आदिवासी पोरिया🧍||
Monday, August 8, 2022
मतदार नोंदणी संधर्भात निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय | voter registration 2022
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी
नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा
17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल.
सन 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.
भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या एक जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या उत्तरार्धात (साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) केले जात होते. जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे.
आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे. हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज (दावे आणि हरकती) प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.
मतदार केंद्र सुसूत्रीकरण
वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे 1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.
इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी
मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाचे तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.
अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी
अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.
Saturday, August 6, 2022
Epeek pahani 2022 | माझा सातबारा मीच नोंदविणार पीक पेरा
ई पीक पाहणी – कशी करायची | E peek pahani 2022
सोप्पी व सुलभ ई-पीक पाहणी सुधारित मोबाईल ऍपमध्ये – E peek Pahani 2022
सन २०२१ मध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आपल्या पिकांची नोंदणी pik pera करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.
गतवर्षी खरीप हंगामा ( kharip 2021 ) मध्ये ९९ लाख ५७ हजार ९४४ हेक्टर, रब्बी हंगामामध्ये २२ लाख, ५२ हजार ५६ हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये २ लाख ९१ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत ४४ लाख १२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍप ( E pik pahani application ) द्वारे पिकांची नोंदणी केली आहे.
त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ऍप ( E-peek pahani ) द्वारे ४०० च्यावर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या असून खरीप हंगाम २०२२ करीता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल अँप्लिकेशन नोंदविण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे.
या साठी मोबाईल ऍप्लिकेशन व्हर्जन-२ विकसित हे सुधारित E peek Pahani New Version – E peek pahani 3.1 5 मोबाईल एप्लिकेशन १ ऑगस्ट २०२२ पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे.
सुधारित मोबाईल अॅपमध्ये ( E pik Pahani New Version ) राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट ( geo tagging ) करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत माहितीमध्ये स्वयंघोषणापत्र ( Self decleration ) घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० % नोंदीची पडताळणी ( Crop verification )तलाठ्यांमार्फत करण्यात येणार असून तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. तलाठी यांच्यामार्फत तपासणी केल्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
ई-पीक पाहणी दुरुस्त
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशन केलेली पीक पाहणी E peek Pahani 2022 ४८ तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
किमान आधारभूत योजनेअंतर्गत ( MSP hamibhav yojana ) येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ( Hamibhav kharedi ) अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
या पूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये ( E pik pahani old application )असलेल्या मुख्य पीक ( Main Crop ) व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधे ऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक ( Pik pera date ) , हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी कार्यालयाकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये ‘मदत’ ( E peek pahani Helpdesk ) हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न ( E peek pahani FAQ )व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर करून शेतकरी अॅप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.
प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा ( pikvima – Crop insurance ) , व पीक विमा दावे ( Crop insurance claim ) निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप ( Crop loan ) , नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.
खरीप हंगाम २०२२ चे पीक पाहणींची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप E pik Pahani New Version व्हर्जन-२ गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप E pik Pahani New Version आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.
Palghar : पालघर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा; ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी
पालघर : सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी, ताप, खोकला, डेंगू सर्दी, पडसे आदी साथीच्या आजाराने (Infection Diseases Reported in Palghar District) विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदल यामुळे साथ रोग झपाट्याने वाढू लागले आहेत, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी (Examination of more than 70 thousand patients) केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे, आदी साथ रोगाचे आहेत. पालघर जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागात तसेच शहराच्या काही ठराविक भागांत डासजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, अशा तापजन गंभीर आजाराबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्यात दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया रुग्णाची संख्या कमी असली तरी डासांच्या प्रादुर्भावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसह ते इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास 30 रुग्ण आढळून आले होते. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले. साथीजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित घेणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवणे, यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनी स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. सध्या आरोग्य विभागाकडून संशयित नागरिकाची आरोग्य तपासणी करून, प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. साथीचेरोग असलेले रुग्ण याची तपासणी व त्यातून निदान केले जात आहे. साथ रोगाला आळा घालण्यासाठी पालघर नगरपालिका प्रशासनाकडून कीटकनाशक फवारणी, धूर करणे, पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकने, आदी उपायोजना करण्यात येत आहेत.
सध्या साथीचारोग वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, तापमान व हवामान बदलाचा परिणाम आहे. या दरम्यान संसर्गातून साथ रोग होतो. मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नाही. साथीचारोग सामान्य प्रकारचा व लवकर बरा होणारा आजार आहे, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यातील साथरोग रुग्ण संख्या वाढीबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांना विचारणा केली असता, सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी; सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारासाठी आरोग्य विभाग, योग्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी ताप, खोकला, मलेरिया, डेंगू चिकन, गुनिया, आदी साथीच्या रोगाच्या आजाराने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
डेंग्यूचा रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - २३ -३
फेब्रुवारी - ५१ - ८
मार्च - ११९ - ९
एप्रिल - ११३ - ५
मे - ११६ - ९
जून - ९८ - १४
जुलै - १३१ - ९
एकूण - ६५१ - ५७
--------/--------------------------
चिकनगुनिया रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
मार्च - ७ - ६
एप्रिल - ११ - ४
जुलै - ७ - १
एकूण - २७ - ११
-------------–------------------
लेप्टोस्पायरोसिस रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - ५ - १
फेब्रुवारी - ५ - २
मे - ३ -१
एकूण - १५ - ४
----------------------/-------
मलेरिया रुग्ण
ग्रामीण
रुग्ण रक्त तपासणी - १९२२७२
पॉझिटिव्ह - ८
मनपा व न.प
रुग्ण रक्त तपासणी - ७८५९४
पॉझिटिव्ह - ३३
तीन महिन्यात 144964 रुग्णांनी केली तपासणी : उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बारा आरोग्य संस्थांमधून 41,746 रुग्णांनी तपासणी केली. मे मध्ये हा आकडा सुमारे पाच हजार रुग्णांनी वाढला. मे महिन्यात 46,118 रुग्णांनी बाह्यरुग्ण सामान्य तपासणी केल्या आहेत. तर जून मध्ये या आकड्यांमध्ये जवळपास नऊ हजार रुग्णांची भर पडली. जूनमध्ये 57 हजार 70 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात आपली सामान्य तपासणी केली आहे.