राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडीओद्वारे ही माहिती दिली आहे. आता बारावीची परीक्षा मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जुनमध्ये घेण्याचे नियोजित आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.