Friday, June 19, 2020

पालघर जिल्हा: आज 5 मृत्यू , नवे 20 पॉझिटीव्ह


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना मुळे 5 मृत्यू झाले असून त्यातील 4 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून वाडा तालुक्यात पहिला मृत्यू उद्भवला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 81 झाली आहे.

आज जिल्ह्यात 20 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यामध्ये जव्हार 6 (जव्हार शहर 4 व जांभूळ विहीर 2), वाडा 6 (वाडा नगरपंचायत 5 व चाम्बळे 1), डहाणूत 5 (डहाणू शहर 3, थर्मल पॉवर स्टेशन 1, वाणगांव- विक्रमनगर 1), पालघर 2 (बोईसर बीएआरसी 1, शिगांव 1) व विक्रमगड तालुक्यातील 1 (झडपोली) कोरोना बाधीताचा समावेश आहे.

Thursday, June 18, 2020

विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी-जिल्हाधिकारी

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी तसेच गरज नसताना घराबाहेर जाऊ नये घराबाहेर जाण्याचे गरजेचे असल्यास किंवा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जाऊन परत घरी परतल्यावर संपूर्ण शरीर निर्जंतूकीकरण करून घ्यावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यावर किमान वीस सेकंद हात धुवावे, सामाजिक अंतर राखावे या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, यांना केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा प्रशासन कोव्हीड-19 विरूद्ध लढा देत असून या युद्धात विद्यार्थी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपला वॉर्ड, गाव कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच आपले कुटंबीयांना या पासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

आपल्या परिसरात कोणाला लक्षणे आळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच
ग्रामीण भागात अशा वर्कर, अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून आरोग्य सर्वे करण्यात येणार असून त्यांना या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.

तलासरी नगरपंचायत - जाहीर सूचना

तलासरी नगरपंचायत जाहीर सूचना

Wednesday, June 17, 2020

🏥कोरोना अपडेट जिल्हा पालघर ग्रामीण

 दिनांक 17/6/2020 संध्याकाळ  6:00 पर्यंत चा अहवाल 

🏥रुग्ण क्रमांक 485 ते 524
*40 नवीन  रुग्ण* 

*एकूण स्त्री रुग्ण*  : 21
*एकूण पुरुष रुग्ण* : 19

*तालुका निहाय रुग्ण संख्या*

*वाडा  तालुका* :  17


🏥रुग्ण क्र. 485-492- प्रा आ केंद्र खनिविली येथील अधिकारी कर्मचारी व निवास स्थानात राहणारे त्यांचे कुटुंबिय आहेत. 

🏥रुग्ण क्र. 493-497- खारीवली  तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 498-499- खुटलपाडा तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 500-  बिलघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

🏥रुग्ण क्र. 501-  भावेघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

*जव्हार  तालुका* -  2

🏥रुग्ण क्र. 502-503 - केळघर तालुका: जव्हार  येथील रहिवासी आहेत. 

*विक्रमगड तालुका* - 14

🏥रुग्ण क्र. 506-517- डोल्हारी तालुका- विक्रमगड  येथील रहिवासी आहेत. 

*डहाणू तालुका* -1

🏥रुग्ण क्र. 518- वरखंडा तालुका : डहाणू  येथील रहिवासी आहे.

*तलासरी तालुका* -6

🏥रुग्ण क्र. 519-  तालुका- सावरोली पाटीलपाडा तालुका : तलासरी येथील रहिवासी आहे.


🏥रुग्ण क्र. 520-521- सुतारपाडा तलासरी येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 522-523- दयानंद हॉस्पिटल  तालुका- तलासरी   येथील कर्मचारी आहेत.

🏥रुग्ण क्र. 524- दापचरी युनिट  तालुका- तलासरी   येथे पोलीस खात्यात कार्यरत आहे.

पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन शेतीशाळा,बांधावर तूर लागवड,पिक विमा योजना अंतर्गत शेतकरीना मार्गदर्शन

   पालघर जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात 1.10 लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन केले असून त्यसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व बियाण्याचे आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

खरीप हंगामात प्रामुख्याने भात या पिकाची लागवड केली जाते, या व्यतिरिक्त काही प्रमाणात नागली व इतर कडधान्य घेतली जातात. जिल्ह्यात भाताचे 22000 क्वी. बियाण्याची मागणी करण्यात आली असून आजरोजी बाजारात विविध कंपनीचे 24000 क्वी. (110%) बियाणे उलब्ध आहे. तसेच रासायनिक खतांची जून अखेरसाठी 8700 मेट्रिक टनाची मागणी नोंदविली असून आजरोजी बाजारात 8500 मेट्रिक टन (97%) रासायनिक खताची उपलब्धता आहे. त्यामुळे बाजारात कुठल्याही प्रकारच्या खतांची व बियाण्याची टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

शेतीशाळा :

 जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची सुरवात झाली असून शेतकरी पूर्व मशागत व भात रोपवाटीकेच्या कामास सुरवात करत आहेत. खरीप हंगामात भात हे प्रमुख पिक असल्याने हंगामात शेतकऱ्यांना भातपिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक कृषी सहाय्यकांच्या समवेत शेतकाऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये बीज प्रक्रिया, रोपवाटिका व्यस्थापन, खत व्यस्थापन, कीड व्यस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

बांधावर तूर लागवड : 

आदिवासी कुटुंबाच्या दैनंदिन आहारात समतोल अन्नघटकांचा समावेश व्हावा यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाच्या सहकार्याने या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व 67000 आदिवासी शेतकऱ्यांना 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके बियाणे वाटप करून त्याची लागवड शेतकरी आपापल्या भाताच्या शेताच्या बांधावर करणार आहे. तुरीच्या लागवडीची पद्धत व त्याचे व्यस्थापन याचे मार्गदर्शन स्थानिक कृषी सहय्यक करणार आहे. यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पिक विमा योजना : 

पालघर जिल्ह्याचे प्रमुख फळपिक चिकू आहे. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.
जव्हार व मोखाडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. योजनेत एक मोठा बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या बागेचा फोटो व अक्षांस/रेखांश अर्जासोबत द्यावे लागणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईलची सोय नसेल त्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.