Friday, July 17, 2020

मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये ‘या’ बँकांनी केले मोठे बदल


मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत देशातील काही प्रमुख बँकांनी मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा या बँकांनी केली आहे. बँकेने हे नियम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बदलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे.


किमान 2 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात ठेवणे आवश्यक आहे, ज्याची मर्यादा याआधी 1,500 रुपये होती. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.

100 रुपयांपर्यंत शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेत कमी लोक यावेत, यासाठी सध्या हे सर्व बँक करीत आहे. त्याचबरोबर बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

तसेच अ‍ॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. पूर्वी कोणतेही शुल्क ECS व्यवहारांवर आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग शुल्क आकारणार आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी डहाणू ते चर्चगेट लोकल


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पहाटे ४.४० वाजता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवारपासून (१७ जुलै) ही फे री सेवेत येईल. यासाठी काही लोकल फेऱ्यांच्या वेळेत व अंतिम स्थानकात बदल केले आहेत.


पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, वैतरणा, बोईसर या भागांतून मुंबईच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मेमू व लोकल चालवण्यात येतात. परंतु पहाटे ५ वाजताची डहाणू ते बोरीवली मेमू गाडी ही ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल म्हणून चालवण्यात येत आहे. त्यामुळे विरारला उतरुन पुन्हा मुंबईच्या दिशेने लोकल पकडावी लागते. परिणामी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अनेक परिचारिका, वॉर्डबॉय यांनी ही वेळ आणि लोकलचे अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही हीच मागणी उचलून धरली. त्यानुसार हा बदल करण्यात येत आहे.

१७ जुलैपासून पहाटे ४.४० वाजता डहाणू ते विरार अशी गाडी चालवली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले. त्यानंतर पहाटे ५.४० वाजता डहाणू रोड ते विरार गाडी असेल. त्याआधीही पहाटे ४.१५ वाजता विरार ते डहाणू रोड आणि सकाळी ७.४० वाजता चर्चगेट ते डहाणू रोड गाडी चालवण्यात येणार आहे. पहाटेच्या ४.४० च्या लोकलमुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.

महाजॉब्स पोर्टल


  •    .महाजॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी कराल ?
  • महाजॉब्स पोर्टल वर आपण मोफत नोंदणी करू शकता. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.

 

  • महाजॉब्स काय आहे?
महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे

 

  • महाजॉब्सवर नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
खालील कागदपत्रे सोबत ठेवावी: १. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे. २. शैक्षणिक प्रमाणपत्र ३. कौशल्य प्रमाणपत्र ४. फोटो

 संकेतस्थळवर जा: https://mahajobs.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020


 


ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने ची घोषणा महाराष्ट्रसरकारने केली आहे. ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्य सरकार महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करेल. या शेतकरी महात्मा फुले कर्ज योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व पीक कर्जे समाविष्ट केली जातील. महात्मा फुले कर्ज माफी योजने चा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020 साठी कागदपत्रांची पात्रता

  • या योजनेंतर्गत लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
  • महाराष्ट्र महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ऑनलाईन कर्ज माफी योजना २०२० अंतर्गत सरकारी नोकरी कामगार किंवा उत्पन्न कर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • ऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरीही या योजनेंतर्गत येतील
  • बँक अधिकारी केवळ त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • संकेतस्थळवर जा: http://www.mjpsky.maharashtra.gov.in

बारावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन! ---श्रीमंत कोकाटे


                   निकालाची सर्वांनाच  विशेषतः  विद्यार्थी पालक  शिक्षक  यांना मोठी उत्सुकता असते  आपण पास होणार की नापास होणार  आपल्याला किती मार्क पडणार  वर्गात आपला कितवा नंबर येणार  याबद्दल कमालीची उत्सुकता असते नापास होणाऱ्या  विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड  प्रचंड मानसिक तणावाचे वातावरण असते

                    आज बारावीचा निकाल लागला.बारावी अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! असंख्य विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळाले. 90% 95% 97% 88% 80%  75% 70 टक्के अशी मार्कस मिळवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

                       पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 40% 46 % 50% 55% 60% 65% मार्क्‍स मिळाले आहेत. काही विद्यार्थी नापास देखील झालेले आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन! कारण मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा जगात काहीही संबंध नाही. जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवलेला आहे, त्यामुळे कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.

                       जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाले होते. ज्यांना आफ्रिकेचे गांधी म्हटले जाते, असे नेल्सन मंडेला लॉ च्या परीक्षेत अनेकवेळा नापास झाले होते. जागतिक कीर्तीचे विद्वान, घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 37.5 टक्के मार्क मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन विश्वविख्यात भाषण करणारे स्वामी विवेकानंद 39 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्यएट झाले होते.सहावी नापास झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जगविख्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.एक दिवस शाळा शिकलेल्या आण्णा भाऊ साठे यांनी 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरची साहित्यनिर्मिती केली. 

                       देशाचे लोकप्रिय नेते माननीय शरद पवार यांना मॅट्रिकला 35 टक्के मार्क्स होते. अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तनिवेदक परीक्षेत नापास झाले होते. महान चित्रपट अभिनेते निर्माते, शाहीर दादा कोंडके  गणित विषयात अनेक वेळा नापास झाले होते.सैराटसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट देणारे निर्माता नागराज मंजुळे दहावीच्या परीक्षेत नापास झाले होते.हिंदकेसरी मारुती माने,गायिका लता मंगेशकर, कुस्तीपट्टू खाशाबा जाधव,महान कलाकार विठाबाई नारायणगावकर यांचे शिक्षण किती? पण त्यांचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांना पास होता आले नाही, किंवा जास्त मार्क मिळाले नाहीत, पण कला,साहित्य, संगीत, क्रीडा, नाट्य, अभिनय, कृषी, उद्योग,संशोधन आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात कार्य करून दाखवले. त्यामुळे मार्क म्हणजे गुणवत्ता नव्हे.

                         सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले सर नेहमी म्हणायचे "चिमणीचे पिल्लू चाळीस दिवसाचे झाले की उंचच उंच भराऱ्या मारायला लागते, परंतु माणसाचे पिल्लू चाळीस वर्षाचे झाले तरी ते स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नाही,कारण पंख हे आतून फुटलेले असतात, पदव्या या बाहेरून चिटकवलेल्या असतात".  स्वामी विवेकानंद म्हणतात "मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय" तर जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते आचार्य ओशो रजनीश म्हणतात "विद्यापीठ आपल्याला गोल्ड मेडल देईल पण कर्तृत्व नाही गाजवले तर ते गोल्ड मेडल तुम्हाला मिट्टी का मेडल भी नही दे सकता". थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात "मेंदू मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय".  

                           परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय, असे देखील विवेकानंद म्हणाले होते, याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.  90%, 95% मार्क मिळविणारे विद्यार्थी केपलर, न्यूटन,आईन्स्टाईन, कोपर्निकस का होत नाहीत?.जास्त मार्क पडणारे बहुतांश विध्यार्थी नोकर होतात, तर कमी मार्क असणारे किंवा नापास होणारे विद्यार्थी उद्योजक,व्यावसायिक होतात.

                            त्यामुळे कमी मार्क पडले निराश होऊ नका, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मार्कांला पर्याय नाही. परंतु नापास झालात म्हणून आपण पराभूत झालो, असे समजू नका.जीवन आणि जग खूप सुंदर आहे.त्यामुळे नापास आणि पास विद्यार्थ्याचे खूप खूप अभिनंदन!

                                            -----श्रीमंत कोकाटे

   (इतिहास,शिक्षणशास्त्र,पुरातत्वशास्त्र,मानवशास्त्र,प्राच्यविद्या इत्यादी विषयाचा अभ्यासक)