Friday, November 25, 2022

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध सिंचन योजना राबवल्या जातात. अशीच एक सिंचन योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तिचं नाव “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” असे आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की या योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना उद्देश

महाराष्ट्र शासनाने 19 ऑगस्ट 2019 रोजी कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील (Rainfed Area/दुष्काळग्रस्त भाग) शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, कोरडवाहू शेती अभियानामध्ये बदल करून “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” अवर्षण प्रवण क्षेत्राबरोबरच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. या योजने नुसार अवर्षणप्रवण घोषित 149 तालुके तसेच अमरावती व औरंगाबाद महसूल विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त म्हणून घोषित केलेल्या चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर सदर योजना सन 2021-22 पासून राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाद्वारे 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आला. आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांत राबवण्यात येत आहे.


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) 45 टक्के अनुदान देण्यात येते. या अनुदानाच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

drip irrigation


मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत दिलेले लाभ आणि आर्थिक मदत

अनु. क्रकुठल्या कामाकरिताअनुदान रक्कम 
1सूक्ष्म सिंचन :
i)ठिबक सिंचन
ii)तुषार सिंचन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देय 55% अनुदानास पूरक अनुदान 25% देऊन 80 टक्के अनुदान देण्यासाठी व इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) देय 40% अनुदानास 30% पूरक अनुदान देऊन एकूण 75 टक्के अनुदान देण्यासाठी आवश्यक निधीच्या मर्यादेत.
2वैयक्तिक शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरणएकूण प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 75000 यापैकी जे कमी असेल ते.
3हरित गृह उभारणे (1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा) रू. 100000/- (एक लाख रुपये) 

4शेडनेट हाऊस उभारणे
(1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा)


 रू. 100000/- (एक लाख रुपये)


अर्जदार शेतकऱ्यांना वरीलपैकी सर्व बाबींचा किंवा त्यांना आवश्यक असेल तेवढ्या बाबींकरिता लाभ घेता येईल. सदर योजनेअंतर्गत विविध बाबींकरिता वरील नमूद केलेले अनुदान हे कमाल स्वरूपात असून संबंधित बाबी करिता केंद्र शासनाने सुचवलेल्या मापदंडानुसार प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा वरील उच्चतम अनुदान मर्यादेची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेच्या अनुदानास अर्जदार शेतकरी पात्र राहतील.

तुषार सिंचन

योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता

  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने अर्जासोबत ज्या जमिनीचा उतारा किंवा दाखला दिला असेल त्याच जमिनीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
  • अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे गरजेचे आहे.
  •  या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी कमाल शेत जमीन मर्यादा 5.00 हेक्टर एवढी राहील.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
  • 7/12 उतारा.
  • 8-अ उतारा.
  • अर्जदाराने नुकतेच काढलेले छायाचित्र.
  • आधार संलग्न असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत.
  • अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र.
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
  • सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा तलाठी यांचेकडील दाखला.
  • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र.
  • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • अधिकृत विक्रेत्याकडून सूक्ष्म सिंचन संच / पंपसंच खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक (Bill/ Invoice) जोडावे लागेल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( वेबसाईट ) जावे  लागेल. तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

 जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक करावे लागेल.  “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

  • वरील पेज वर तुम्हाला अर्जदाराचे नाव भरावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (लॉगिन आयडी) आणि पासवर्ड दिलेल्या सूचना नुसार प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर जर तुमचा ईमेल आयडी असेल तर तो प्रविष्ट करून “ईमेल आयडी ची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या ईमेल आयडी वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “मोबाइल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  •  त्यानंतर प्रतिमेत दर्शविलेले शब्द (captcha) प्रविष्ट करून “नोंदणी करा” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओके वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
  • आता खालील पेजवर तुम्ही लॉगिन चा प्रकार निवडून लॉगिन करू शकाल.
  • वापरकर्ता आयडी मध्ये तुम्हाला जो तुम्ही वरील प्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो प्रविष्ट करून लॉगिन करता येईल.
  • किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकाल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यावर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येईल तो प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) संपूर्णपणे भरावी लागेल. सर्व * चिन्हांकित माहिती भरणे अनिवार्य राहील जसे संपूर्ण नाव, जातीचा तपशील, आधार संलग्न बँक खात्याची माहिती, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, शेत जमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून आपण आपले प्रोफाईल स्थिती 100% पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला ठिबक / तुषार सिंचनाचा उपयोग ज्या पिकांसाठी करावयाचा आहे त्या “पिकांचा तपशील सादर करा” यावर क्लिक करुन पिकांचा संपूर्ण तपशील भरावा लागेल.
  • त्यानंतर “मुख्यपृष्ठ” वर क्लिक केल्यावर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर “अर्ज करा” वर आपल्याला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुम्हाला सदर योजना निवडून त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर बाबी निवडा वर क्लिक करून ओपन झालेल्या पेजवर संपूर्ण माहिती भरून “जतन करा” यावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर “मेन्यूवर जा” यावर क्लिक करून “अर्ज सादर करा” वर क्लिक करावे लागेल’ शेवटी तुम्हाला Make Payment वर क्लिक करून Wallet/Net Banking/Credit-Debit card/ IMPS/UPI यापैकी कुठलाही पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

अशाप्रकारे आपण ठिबक व तुषार सिंचनासाठी सदर योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच, ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेचे उद्दिष्ट :

या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

योजनेत समाविष्ट पिके

आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

नाविन्यपूर्ण बाबी

• फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)

• घन लागवडीचा समावेश

• ठिबक सिंचन अनिवार्य

• शेतकऱ्यांचा सहभाग

समाविष्ट बाबी

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे - जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतर मशागत करणे.

शासन अर्थसहाय्यित बाबी / कामे - खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षण.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx


अटी व शर्ती

या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरीक्त इतर लाभार्थींना या योजनेतून लाभ घेता येईल.

यासाठी शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे किमान 20 गुंठे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 असावा. जर लाभार्थी उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असून लाभार्थ्याच्या 7/12 वर नोंदणी बंधनकारक आहे.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx



महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टर पर्यंत लाभ अनुज्ञेय राहील. सदर कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एका पेक्षा जास्त फळ पिके लागवडीकरिता देखील पात्र राहील. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ यापूर्वी घेतला असल्यास लाभ क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना ज्यांची उपजीविका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. तसेच, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx


लाभार्थी निवड कार्यवाही

इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची तालुकानिहाय सोडत पद्धतीने निवड उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी संयुक्तपणे करतील. लक्षांकाप्रमाणे अर्ज प्राप्त न झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा जाहिरात देण्यात येईल.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

Wednesday, November 23, 2022

मतदान कार्ड काढा वयाच्या 17 वर्षी


निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदविण्याची तरतूद होती. मात्र आता 17 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

मात्र वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे नाव मतदार यादीत येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा या वर्षापासून उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी भोसले यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.

भोसले म्हणाले, “मतदारांना नावनोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनी करता येईल. मात्र अर्ज भरून दिल्यानंतर जर पत्ता बदलला असेल, तर त्याची माहिती कळवावी लागेल. {Voter ID Card Online Apply}

अर्जदाराच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान कर्मचारी त्याच्या नावनोंदणीचा अर्ज नमुना-6 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जमा करतील. मतदार यादीतील दुरुस्तीसाठी अर्ज नमुना 8 भरून द्यावा, मृत दुबार व स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळली जातील. त्यासाठी अर्जनमुना 7 भरून द्यायचा आहे.


मतदान कार्ड काढा वयाच्या 17 वर्षी

मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांतून जनजागृती केली जात आहे. याशिवाय 19, 20 नोव्हेंबर, 3 व 4 डिसेंबरला विशेष पडताळणी केली जाईल. निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 “Voter ID Card Online Apply”

पर्यंत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत राबविला जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. हरकती व दावे 8 डिसेंबरपर्यंत स्वीकारले जातील. 26 डिसेंबरला ते निकाली काढले जातील. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होईल


Monday, November 21, 2022

जीवन प्रमाणपत्र हे घरबसल्या आता व देशभर प्रचार मोहीम

आता घरबसल्या जीवन प्रमाणपत्र, देशभर प्रचार मोहीम 

jeevan pramaan face app


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

1 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 29 लाख 29,986 डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) जारी करण्यात आले होते. यापैकी एकूण 1 लाख 52 हजार 172 निवृत्तीवेतन धारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचा पर्याय निवडला आहे. 

डीएलसी निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची संख्या 11 लाख 95 हजार 594 आहे, त्यापैकी 96,099 केन्द्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डीएलसीची निवड केली आहे.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना तासनतास बँकांबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता घरबसल्या एका बटणाच्या क्लिकवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. 

मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रथमच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक आणि बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहेत. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण प्राधिकरणासाठी देखील उपलब्ध आहे.

Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx


निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW)  सर्व निवृत्तीवेतनधारकांना विभागाच्या DOPPW_INDIA OFFICIAL,  या अधिकृत  यू ट्यूब  वाहिनीला भेट देण्याची विनंती केली आहे, जिथे साध्या भाषेत चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने  सर्व पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.


Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx

Friday, November 18, 2022

आधारभुत खरेदी योजना

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महमंडळ मर्या. नाशिक -02
प्रादेशिक कार्यालय - जव्हार
उप प्रादेशिक कार्यालय - कासा
खरेदी केंद्र - उपलाट व उधवा, ता. तलासरी, जिल्हा- पालघर
आधारभुत खरेदी योजना
हंगाम: 2022-23

१.धान/भात(पीक)--- आधारभूत किंमत रु (साधरण २०४०)/(दर्जा २०६०) शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. २०४०/२०६०

२.धान्य/रागी(नागली)--- आधारभूत किंमत रु (३५७८) शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. ३५७८

आवश्यक सूचना:
१. ८ अ. व ७/१२ उतारा
२. पासबुक
३. आधारकार्ड