Wednesday, June 17, 2020

🏥कोरोना अपडेट जिल्हा पालघर ग्रामीण

 दिनांक 17/6/2020 संध्याकाळ  6:00 पर्यंत चा अहवाल 

🏥रुग्ण क्रमांक 485 ते 524
*40 नवीन  रुग्ण* 

*एकूण स्त्री रुग्ण*  : 21
*एकूण पुरुष रुग्ण* : 19

*तालुका निहाय रुग्ण संख्या*

*वाडा  तालुका* :  17


🏥रुग्ण क्र. 485-492- प्रा आ केंद्र खनिविली येथील अधिकारी कर्मचारी व निवास स्थानात राहणारे त्यांचे कुटुंबिय आहेत. 

🏥रुग्ण क्र. 493-497- खारीवली  तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 498-499- खुटलपाडा तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 500-  बिलघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

🏥रुग्ण क्र. 501-  भावेघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

*जव्हार  तालुका* -  2

🏥रुग्ण क्र. 502-503 - केळघर तालुका: जव्हार  येथील रहिवासी आहेत. 

*विक्रमगड तालुका* - 14

🏥रुग्ण क्र. 506-517- डोल्हारी तालुका- विक्रमगड  येथील रहिवासी आहेत. 

*डहाणू तालुका* -1

🏥रुग्ण क्र. 518- वरखंडा तालुका : डहाणू  येथील रहिवासी आहे.

*तलासरी तालुका* -6

🏥रुग्ण क्र. 519-  तालुका- सावरोली पाटीलपाडा तालुका : तलासरी येथील रहिवासी आहे.


🏥रुग्ण क्र. 520-521- सुतारपाडा तलासरी येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 522-523- दयानंद हॉस्पिटल  तालुका- तलासरी   येथील कर्मचारी आहेत.

🏥रुग्ण क्र. 524- दापचरी युनिट  तालुका- तलासरी   येथे पोलीस खात्यात कार्यरत आहे.

पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन शेतीशाळा,बांधावर तूर लागवड,पिक विमा योजना अंतर्गत शेतकरीना मार्गदर्शन

   पालघर जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात 1.10 लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन केले असून त्यसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व बियाण्याचे आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

खरीप हंगामात प्रामुख्याने भात या पिकाची लागवड केली जाते, या व्यतिरिक्त काही प्रमाणात नागली व इतर कडधान्य घेतली जातात. जिल्ह्यात भाताचे 22000 क्वी. बियाण्याची मागणी करण्यात आली असून आजरोजी बाजारात विविध कंपनीचे 24000 क्वी. (110%) बियाणे उलब्ध आहे. तसेच रासायनिक खतांची जून अखेरसाठी 8700 मेट्रिक टनाची मागणी नोंदविली असून आजरोजी बाजारात 8500 मेट्रिक टन (97%) रासायनिक खताची उपलब्धता आहे. त्यामुळे बाजारात कुठल्याही प्रकारच्या खतांची व बियाण्याची टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

शेतीशाळा :

 जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची सुरवात झाली असून शेतकरी पूर्व मशागत व भात रोपवाटीकेच्या कामास सुरवात करत आहेत. खरीप हंगामात भात हे प्रमुख पिक असल्याने हंगामात शेतकऱ्यांना भातपिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक कृषी सहाय्यकांच्या समवेत शेतकाऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये बीज प्रक्रिया, रोपवाटिका व्यस्थापन, खत व्यस्थापन, कीड व्यस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

बांधावर तूर लागवड : 

आदिवासी कुटुंबाच्या दैनंदिन आहारात समतोल अन्नघटकांचा समावेश व्हावा यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाच्या सहकार्याने या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व 67000 आदिवासी शेतकऱ्यांना 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके बियाणे वाटप करून त्याची लागवड शेतकरी आपापल्या भाताच्या शेताच्या बांधावर करणार आहे. तुरीच्या लागवडीची पद्धत व त्याचे व्यस्थापन याचे मार्गदर्शन स्थानिक कृषी सहय्यक करणार आहे. यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पिक विमा योजना : 

पालघर जिल्ह्याचे प्रमुख फळपिक चिकू आहे. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.
जव्हार व मोखाडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. योजनेत एक मोठा बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या बागेचा फोटो व अक्षांस/रेखांश अर्जासोबत द्यावे लागणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईलची सोय नसेल त्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.

कुपोषित बालके, गरोदर माता यांना उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि 17 : जिल्ह्यातील कुपोषित बालके तसेच गरोदर माता यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
पहिल्या टप्यात अमृत आहार योजनेच्या लाभार्थीची प्रकल्प निहाय मागणी जनरेट करण्यात आली असून. दुसऱ्या टप्प्या तील निधी जलद गतीने वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. सध्यास्थितीत तालुका निहाय निधी वितरीत झाला आहे. शासन निर्णयानुसार सन 2020-21 मधील अर्थसंकल्पीय निधीच्या 33% निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले. 
 कुपोषण निर्मुलन अंतर्गत टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधकारी कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा परषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेन्द्र वारभुवन, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, श्री. नायर, उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, स्वप्नील तागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
बाल उपचार केंद्र (CTC) वाढविण्याची वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
या केंद्र मध्ये आवश्यतेप्रमाणे बालकांना दाखल करण्यात येणार आहे. पावसाळ्यात सर्व्हेमध्ये आढळुन आलेल्या आजारी सॅम बालकांना सीटीसी मध्ये उपचार करण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
आदिवासी भागातील कुपोषित बालके, गरोदर माता यांना पोषक आहार देण्याबाबत अंगणवाडी सेवीकांना आधुनिक पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून, पालघर, वसई, डहाणु, तलासरी तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी संहिता संस्था, ग्राममंगल संस्था यांचा सामंजस्य करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित करण्यात येत आहे.
वाडा तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित  करण्यात येत आहे.
विक्रमगड व जव्हार तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांच्याशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
कोसबाड येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण देणारे शासकीय प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच येथे ग्रामसेवकांना देखील प्रशिक्षण दिले जाते.
कुपोषित बालकांचे वजन करण्याबाबतची कार्यवाही सुरु असून अंगणवाडीतील बालकांचेहि वजन उंची पालकांच्या समक्ष घेण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Tuesday, June 16, 2020

दिवसभरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 47 नवे पॉझिटीव्ह


आज 47 नवे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये एकट्या वाडा तालुक्यातील 27 व जव्हार तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यात 2 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून विक्रमगड येथे 1 व डहाणू तालुक्यात (वाणगांव) 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.