Sunday, June 21, 2020

आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

|| आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन ||

ऑनलाईन माध्यमातून करियर विषयी विविध शंका, संधी, प्रोत्सहन साठी मार्गदर्शन, मेंटॉरशिप, समुपदेशन इत्यादी आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. लिंक https://forms.gle/W4DmyLgqv8uoxZiC8 आपल्या संपर्कातील इच्छुकांना कळवावे. जोहार!

______________________________
TTSF & AYUSH Initiative for Students

Friday, June 19, 2020

मन, स्वभाव व ताणतणाव

लेख थोडा मोठा असला तरी अवश्य पूर्ण वाचा.

मन

मानवी मनाचे तीन भाग असतात
◆व्यक्त मन (Conscious Mind):- मनाच्या या भागातील विचार व भावना आपल्याला सहजी अनुभवता येतात.
◆अव्यक्त मन (Unconscious Mind):-मनाच्या या भागामधील विचार व भावना आपल्याला सहजासहजी अनुभवता येत नाहीत. अनेक प्रकारच्या मानसिक अस्वस्थता याच भागातून निर्माण होतात.
◆अर्धव्यक्त मन (Subconscious Mind):- काँशियस माइंड व अंकाँशियस माइंड या मधील ब्रिज म्हणजे सबकाँशियस माइंड. या भागामध्ये दोन्ही भागांच्या विचार व भावनांचे मिक्सर चालू असते.
मानवी मनाच्या स्वास्थ्यासाठी या तिन्ही भागांचा समतोल राखणे अतिशय महत्वाचे असते. यामधील कुठलाही असमतोल मानसिक अस्वस्थता निर्माण करतो.

स्वभाव

प्रत्येक व्यक्तीची स्वतःला व आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना हाताळण्याची विशिष्ट अशी पद्धत असते, या पद्धतीला त्या व्यक्तीचा स्वभाव असे म्हंटले जाते.
स्वभावाचे दोन भाग असतात.
◆Temperament :- नैसर्गिक रित्या आनुवंशिक भेटलेला भाग म्हणजेच टेम्परामेन्ट
◆Character:- व्यक्तीला त्याच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांमधून घडणारा भाग म्हणजेच कॅरॅक्टर
जसे लहान बाळाचे टेम्परामेन्ट आपल्याला लगेच समजते उदा. काही बाळ लहान पणापासून शांत असतात तर काही चंचल तर काही अस्वस्थ व चिडचिडी असतात.
लहानपणापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आपल्याला वेगवेगळे असे अनेक अनुभव येत असतात. या अनुभवामधून आपल्या कॅरॅक्टर मद्धे वेळोवेळी अनेक बदल घडून येत असतात.
व्यक्तीची स्वप्रतिमा, ताणतणाव हाताळण्याची पद्धत, विविध अनुभवांना सामोरे जाण्याची पद्धत, इतर लोकांशी वागण्याची पद्धत अशा सर्व गोष्टींवरून व्यक्तीचा स्वभाव ठरत असतो.
आदर्श स्वभाव वास्तवात असणे अशक्य आहे असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात दोष हा असतोच.

ताणतणाव

ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. स्ट्रेस म्हणजे प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कमी पडते , तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ताणतणाव असे म्हणतात.
सध्या बहुतेक लोकांचे आयुष्य हे गतिमान झाले आहे व स्पर्धा ही खूप वाढली आहे. या दोन्ही गोष्टींचा स्वाभाविकच परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला होऊन ताणतणाव वाढत आहेत. तसेच कौटुंबिक ताणतणाव, भौतिक सुखाच्या मागे लागणाऱ्या सध्याच्या संस्कृतीमुळे उदभवणारे ताणतणाव व इ. अश्या अनेक प्रकारच्या ताणतणावांना बऱ्याच लोकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार स्ट्रेस हाताळण्याची क्षमता ही भिन्न भिन्न असते त्यामुळे प्रत्येक जण तणावग्रस्थ होत नसतो. ज्या माणसाची तणाव हाताळण्याची क्षमता मुळातच कमी असते अश्या व्यक्तीवर वरील काही गोष्टीमुळे उदभवणाऱ्या ताणतणावाची लक्षणे लगेच दिसायला सुरुवात होते.
व्यक्तीला येणारा ताण हा वाईटच असतो असे मला अजिबात वाटत नाही कारण ताण तणावात काम करायला मला स्वतःला खूप मजा येते. माझ्या सहकाऱ्यांनी व माझ्या आयुष्याशी निगडित बऱ्याच जणांनी ते अनुभवलं ही आहे व असेल. थोडा हलका तरी स्ट्रेस हा हवाच जसे कल्पना करा की परीक्षेच्या आधी किव्हा एखाद्या सामन्याच्या आधी आपल्याला ताण आलाच नाही तर?...
म्हणजेच ताण वाढला की परफॉर्मन्स ही वाढतो पण एका मर्यादेपेक्षा ताण वाढला व तो हाताळता आला नाही की परफॉर्मन्स कमी होत जातो.

So Moral Of The Story:-
शरीराचे आरोग्य कसे टिकवावे ह्या विषयी बऱ्याच जणांना माहिती आहे पण मनाचे आरोग्य हा विषय दुर्लक्षितच राहतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मनाचे आरोग्य राखू शकतो.
उदा. आपल्याला आवडणारे तसेच आधार देणारे नातेसंबंध नेहमी जोपासणे, आपल्याला ताण येणार नाही असे ध्येय व उद्दिष्ट्ये ठरवणे कारण अनेकवेळा आपण आपणच ठरवलेली ध्येय गाठण्याच्या नादात एवढा ताण वाढवतो की आपले मानसिक आरोग्य खालावते. आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याची गती कमी करणे कारण आयुष्याच्या वाढत्या गतिमानते मुळे आयुष्यातील अनेक लहान मोठया आनंदाना आपण मुकत असतो व त्यामधून सुद्धा मानसिक अस्वस्थतेचा जन्म होत असतो. तसेच इतर छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या सांगायची गरज नाही उदा. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप, आवडते छंद जोपासणे, अपल्या व्यक्तित्वामधील दोष सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे व इतर.
शरीराचा व मनाचा एक अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो आपल्यालाच समजून घेतला पाहिजे.
(हे लिहिल्या नंतर मला माझ्या वाचनात आलेल्या दोन पुस्तकांना धन्यवाद देणं आवश्यक वाटत आहे)
मनोविश्लेषण:-Sigmund Freud
प्रश्न मनाचे:- नरेंद्र दाभोलकर
धन्यवाद🙏🙏

उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर इच्छुकांना एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती

संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन


मुंबईदि. 18 : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

खाजगीशासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा

पालघर जिल्हा: आज 5 मृत्यू , नवे 20 पॉझिटीव्ह


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना मुळे 5 मृत्यू झाले असून त्यातील 4 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून वाडा तालुक्यात पहिला मृत्यू उद्भवला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 81 झाली आहे.

आज जिल्ह्यात 20 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यामध्ये जव्हार 6 (जव्हार शहर 4 व जांभूळ विहीर 2), वाडा 6 (वाडा नगरपंचायत 5 व चाम्बळे 1), डहाणूत 5 (डहाणू शहर 3, थर्मल पॉवर स्टेशन 1, वाणगांव- विक्रमनगर 1), पालघर 2 (बोईसर बीएआरसी 1, शिगांव 1) व विक्रमगड तालुक्यातील 1 (झडपोली) कोरोना बाधीताचा समावेश आहे.

Thursday, June 18, 2020

विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी-जिल्हाधिकारी

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी तसेच गरज नसताना घराबाहेर जाऊ नये घराबाहेर जाण्याचे गरजेचे असल्यास किंवा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जाऊन परत घरी परतल्यावर संपूर्ण शरीर निर्जंतूकीकरण करून घ्यावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यावर किमान वीस सेकंद हात धुवावे, सामाजिक अंतर राखावे या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, यांना केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा प्रशासन कोव्हीड-19 विरूद्ध लढा देत असून या युद्धात विद्यार्थी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपला वॉर्ड, गाव कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच आपले कुटंबीयांना या पासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

आपल्या परिसरात कोणाला लक्षणे आळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच
ग्रामीण भागात अशा वर्कर, अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून आरोग्य सर्वे करण्यात येणार असून त्यांना या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.