Wednesday, May 24, 2023

होम लोन घेताना कोणत्या विषयी माहिती लक्षात ठेवावे!



home loan

मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात. कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
कोणते कारण ? 
घर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज
पात्रता कशी ठरते?
होम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.
■ चांगल्या सिबिल स्कोअरमुळे मंजुरींची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असेल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परतफेडीची क्षमता तपासली जाते.

किती कर्ज मिळते?
तुमच्या मासिक पगाराच्या ५० टक्के रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी भरता येईल, अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी होम लोनची रक्कम वाढेल.
कोणती कागदपत्रे ?
आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / चालक परवाना, नियोक्ता ओळखपत्र, सैलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो में १६ किंवा आयकर रिटर्नसह ६ महिन्यांचे जुने बैंक स्टेटमेंट व्याजदर कसे निवडावेत?

फिक्स्ड रेट
ठरलेल्या व्याजदरानेच गृहकर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत असे भरावे लागतात.

फ्लोटिंग रेट
यात दर बाजारातील व्याजदरातील चढउतारानुसार बदलतात, व्याजदर वाढतो तेव्हा असेही वाढतात. कमी असेल, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी होते.

घराच्या एकूण किमतीच्या ८० ते ९० टक्के रक्कम होमलोन म्हणून मिळते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांचाही समावेश असतो.

Monday, May 15, 2023

रात्री दहापर्यंत चालेल आपला दवाखाना; पैसे न घेता तपासणी

पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ तालुक्यांत दवाखाने सुरू

राज्य  सरकारने मुंबईसह राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सातशे दवाखाने सुरू केले जाणार असून, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत आठ तालुक्यांत हे दवाखाने सुरू झालेले आहेत. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तींमागे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे.



राज्यातील ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना छोट्या-छोट्या आजारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावं लागते, त्यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतो. शिवाय प्रवासाचा खर्चही होतो. त्याच्यातच राहण्याचीसुद्धा गैरसोय होत असल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे.
 
"वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना"
  • मोफत तपासणी व मोफत उपचार

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात १ मे पासून 'आपला दवाखाना' सुरु करण्यात आला असून सकाळी ते रात्री दहापर्यंत हे दवाखाने सुरु राहणार असून, १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.


'आपला दवाखानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून औषधोपचार मिळत आहेत.- एक अधिकारी. जिल्हा परिषद

  • विनामूल्य उपचार
गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, बाह्य यंत्रणेद्वारे मोफत प्रयोगशाळा तपासणी, महिन्याच्या निश्चित दिवशी नेत्रतपासणी, मानसिक आरोग्य व समुपदेशन आवश्यकतेनुसार विशेषत संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.

  • "आपला दवाखाना पालघरमध्ये आठ 'आपला दवाखाना'
पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत.कोणत्या तालुक्यात किती?

तालुका संख्या

अ) पालघर (नवली) १

ब) डहाणू (लोणी पाडा) १

क) तलासरी (नगर पंचायत) १

ड) विक्रमगड (नगर पंचायत) १

इ) जव्हार (मांगेल वाडा) १

दुपारी दोन ते रात्री १० पर्यंत उघडा राहणार

प) मोखाडा (नगर पंचायत) १

फ) वाडा (नगर पंचायत) १

(भ) वसई (महानगरपालिका) १

पालघरमधील 'आपला दवाखाना'त दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. येथील बहुतांश नागरिक हे शेतकरी, मजूर असल्याने सकाळच्या वेळात त्यांची कामे असतात, त्यामुळे दवाखान्याचा लाभ शेतकरी, कष्टकरी वर्गाला घेता येत आहे.

 

Sunday, May 14, 2023

कृषि विभागाने जाहिर सुचना

महाराष्ट्र शासन तर्फे कृषि विभागाने जाहिर सुचना 

MahaDBT Online Portal वर शेतकरी योजनाचे लाभ घ्यावे.
विविध योजने अंतर्गत शेतकऱ्यानी ऑनलाईन अर्ज भरणे बाबत दिनांक 15/05/2023 पर्यंत ऑनलाईन सोडत असणार आहे. तरी शेतकऱ्यानी सदरील योजनेच्या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करावे व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. 

खालीलप्रमाणे घटक


ट्रैक्टर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टीक मल्चींग, रोपवाटिका, फळबाग लागवड, फुल शेती, विदयुत मोटार पंप संच ...
15 मे 2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही याची नोंद घ्यावी.

Thursday, May 11, 2023

Staff Selection Commission मार्फत 1600 जागांसाठी भरती

Staff  Selection Commission

Staff  Selection Commission,
Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2023, 
SSC CHSL Recruitment 2023. SSC CHSL Bharti 2023 for 1600 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts.>;

परीक्षेचे नाव: Staff  Selection Commission  (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023

 

 
पदाचे नाव: Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator
 
पद क्र.  पदाचे नाव      पद संख्या
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)        1600

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)


डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’



Total      1600 VACANCY
 


शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
 
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे 
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 
Fee: General/OBC: ₹100/-  
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2023
परीक्षा CBT:
 
Tier-I: ऑगस्ट 2023


Tier-II: नंतर घेतले जाईल.
अधिकृत वेबसाईट: click here
 

ऑनलाईन अर्ज: click here



Monday, May 8, 2023

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी Bandhkam Kamgar nondani Maharashtra

                           Bandhkam Kamgar nondani Maharashtra

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईनच प्रथम नोंदणीसाठी 37 रुपये तर वार्षिक नुतणीकरणासाठी केवळ 12 रुपये शुल्कनोंदणीसाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही, दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये


बांधकाम कामगारांनी 7 मेपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी. राज्य शासनाचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, परभणी व एच.एल.एल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ मे या दरम्यान शासकीय योजनांची जत्रा अंतर्गंत ‘योजना जन कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी’ कार्य्रक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह (www.mahabocw.in) संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी  यांनी केले आहे. 

राज्य शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी कामगारांनी ही नोंदणी करावी.  


राज्य शासनाच्या ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी नावनोंदणीसाठी संगणकीकृत प्रणालीद्वारे अर्ज करावेत. कामगारांच्या अर्जांची नंतर तपासणी होते. 
योग्य व परिपूर्ण माहिती भरलेल्या अर्जांच्या तपासणीनंतर या योजनेसाठी पात्र लाभार्थी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात विविध योजनेची रक्कम थेट हस्तांतरित होते. या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहासाठी, पत्नीच्या प्रसूतीसाठी व घर बांधणीसाठी विविध लाभ देण्यात येतात, असेही सरकारी कामगार अधिकारी श्री. माणगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटपाची प्रक्रिया ऑनलाईन सुरु असून याकरीता मंडळानी www.mahabocw.in ही वेबसाईट विकसीत केलेली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना कळविण्यात येते की, मंडळामध्ये प्रथम नोंदणी करण्याकरीता रुपये 25 नोंदणी शुल्क तसेच वार्षीक सभासद वर्गणी रु. 12 असे एकूण 37 रुपये शुल्क आकारले जाते. तसेच दरवर्षी नोंदणीचे नुतणीकरण करणे आवश्यक असून रु. 12 वार्षीक नुतणीकरण शुल्क आकारण्यात येते.

नोंदणी कशी करावी काय आहेत योजना पहा खालील लिंक वर 

......

कामगारांचा अर्ज मंजूर झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर सदर शुल्क ऑनलाईन भरण्याबाबत लिंक नोंदित मोबाईल क्रमांकावर पाठविल्या जाते. सदर लिंकवर जावून विहीत शुल्क भरावे. 

या व्यतीरिक्त कोणतेही शुल्क मंडळाकडून आकारले जात नाही. कार्यालयाकडून कोणत्याही दलाल, मध्यस्थी (एजंट) किंवा अन्य व्यक्ती यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणासही पैसे देण्याची आवश्यकता नाही. तरी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व फसगत करुन घेवू नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांनी केले आहे.